IND vs BAN, T20I Series 2024: भारताला मिळणार नवा टी-20 कर्णधार? सूर्यकुमारच्या दुखापतीमुळे बांगलादेश मालिकेपूर्वी सस्पेन्स वाढला

IND vs BAN: चेन्नईच्या एमए चिदंबरम स्टेडियमवर 19 सप्टेंबरपासून लाल चेंडूंच्या दोन सामन्यांच्या मालिकेला सुरुवात होणार आहे. या मालिकेनंतर टीम इंडिया आणि बांगलादेश यांच्यात तीन सामन्यांची टी-20 आंतरराष्ट्रीय मालिका खेळवली जाणार आहे. या मालिकेतील पहिला सामना 6 ऑक्टोबरला होणार आहे.

Team India (Photo Credit - X)

Indian National Cricket Team vs Bangladesh National Cricket Team:  श्रीलंका दौऱ्यानंतर भारतीय राष्ट्रीय क्रिकेट संघ (Indian National Cricket Team) आता विश्रांतीवर आहे. टीम इंडियाला आता सप्टेंबरमध्ये बांगलादेश राष्ट्रीय क्रिकेट संघाविरुद्ध (Bangladesh National Cricket Team) पुढील मालिका खेळायची आहे. दोन्ही संघांमध्ये कसोटी आणि टी-20 सामने खेळवले जाणार आहेत. चेन्नईच्या एमए चिदंबरम स्टेडियमवर 19 सप्टेंबरपासून लाल चेंडूंच्या दोन सामन्यांच्या मालिकेला सुरुवात होणार आहे. या मालिकेनंतर टीम इंडिया आणि बांगलादेश यांच्यात तीन सामन्यांची टी-20 आंतरराष्ट्रीय मालिका खेळवली जाणार आहे. या मालिकेतील पहिला सामना 6 ऑक्टोबरला होणार आहे. (हे देखील वाचा: BCCI On Bouncer Rule: काय सांगता! आता गोलंदाज 1 षटकात 2 बाऊन्सर टाकू शकणार नाहीत? आयपीएलपूर्वी बीसीसीआय घेऊ शकते मोठा निर्णय)

सुर्यकुमार यादवला दुखापत

बांगालदेशविरुद्ध मालिकेपूर्वी टीम इंडियासाठी एक वाईट बातमी येत आहे. टीम इंडियाचा टी-20 कर्णधार सूर्यकुमार यादव बुची बाबू आंतरराष्ट्रीय स्पर्धेच्या सामन्यादरम्यान जखमी झाला, त्यानंतर त्याला तात्काळ मैदान सोडावे लागले. मात्र, आतापर्यंत सूर्यकुमार यादवच्या दुखापतीबाबत कोणतीही माहिती मिळालेली नाही. सूर्यकुमार यादव लवकर फिट झाला नाही तर टीम इंडियाला मोठा फटका बसू शकतो.

भारताला मिळणार नवा टी-20 कर्णधार?

टीम इंडियाला आगामी काळात अनेक सामने खेळायचे आहेत. टीम इंडिया आणि बांगलादेश यांच्यात ऑक्टोबरमध्ये 3 सामन्यांची टी-20 मालिका खेळवली जाणार आहे. तोपर्यंत सूर्यकुमार यादव तंदुरुस्त नसेल, तर बांगलादेश मालिकेत भारताचा टी-20 कर्णधार कोण असेल, हा मोठा प्रश्न आहे.

कोण होणार कर्णधार

हार्दिक पांड्या (Hardik Pandya)

या यादीत पहिले नाव अष्टपैलू हार्दिक पांड्याचे आहे. जर सूर्यकुमार यादव तंदुरुस्त नसेल तर हार्दिक पांड्याकडे पुन्हा एकदा कर्णधारपदाची जबाबदारी दिली जाऊ शकते. रोहित शर्माच्या निवृत्तीनंतर बीसीसीआयने हार्दिक पांड्याच्या जागी सूर्यकुमार यादवला संघाचा नवा कर्णधार बनवला होता, मात्र आता सूर्यकुमार यादवच्या दुखापतीने हार्दिक पांड्यासाठी पुन्हा दरवाजे उघडले आहेत. हार्दिक पांड्याने 16 सामन्यांमध्ये टीम इंडियाचे नेतृत्व केले आहे. या काळात टीम इंडियाने 10 सामने जिंकले आणि 5 सामने गमावले.

शुभमन गिल 

या यादीत दुसरे नाव आहे ते संघाचा सलामीवीर शुभमन गिलचे. जर सूर्यकुमार यादव तंदुरुस्त नसेल तर बांगलादेशविरुद्धच्या टी-20 मालिकेसाठी शुभमन गिलला संघाचा कर्णधार बनवले जाऊ शकते. शुभमन गिलला नुकतेच श्रीलंका दौऱ्यावर संघाचा उपकर्णधार करण्यात आले. यासोबतच शुभमन गिलने झिम्बाब्वे दौऱ्यात टी-20 मालिकेत टीम इंडियाचे नेतृत्वही केले होते. शुभमन गिलने शानदार कर्णधार केले आणि टीम इंडियाने पहिला सामना गमावल्यानंतर 4-1 ने मालिका जिंकली.

ऋषभ पंत

या यादीत पुढचं नाव आहे टीम इंडियाचा स्टार यष्टीरक्षक फलंदाज ऋषभ पंतचं. ऋषभ पंतने आयसीसी टी-20 विश्वचषक 2024 च्या माध्यमातून टीम इंडियामध्ये शानदार पुनरागमन केले. जर सूर्यकुमार यादव तंदुरुस्त नसेल तर ऋषभ पंतलाही कर्णधार म्हणून पाहिले जाऊ शकते. ऋषभ पंत दीर्घकाळापासून आयपीएलमध्ये दिल्ली कॅपिटल्सचे नेतृत्व करत आहे. ऋषभ पंतने टीम इंडियाच्या टी-20 संघाचे नेतृत्वही केले आहे. 2022 मध्ये ऋषभ पंतने 5 टी-20 सामन्यांमध्ये कर्णधारपद भूषवले होते. यादरम्यान ऋषभ पंतने 2 जिंकले तर 2 मध्ये पराभवाचा सामना करावा लागला. एका सामन्याचा निकाल जाहीर होऊ शकला नाही.

(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)

Share Now

Share Now