Virat Kohli vs Babar Azam: आयसीसी टूर्नामेंटमध्ये जेव्हा-जेव्हा टीम इंडिया आणि पाकिस्तान आमने-सामने आले, तेव्हा 'हा' घडला अनोखा योगायोग

विराट कोहली (Virat Kohli) आणि बाबर आझम (Babar Azam) हे सध्याच्या काळातील दोन्ही संघांचे दोन मोठे दिग्गज आयसीसी टूर्नामेंट सामन्यांमध्ये पाच वेळा आमनेसामने आले आहेत. दोन्ही संघांमध्ये निकराची लढत होत आहे.

Virat Kohli And Babar Azam (Photo Credit - Twitter)

आयसीसी स्पर्धेत 1992 नंतर टीम इंडिया आणि पाकिस्तानचे (IND vs PAK) संघ अनेकदा भिडले आहेत. पण विराट कोहली (Virat Kohli) आणि बाबर आझम (Babar Azam) हे सध्याच्या काळातील दोन्ही संघांचे दोन मोठे दिग्गज आयसीसी टूर्नामेंट सामन्यांमध्ये पाच वेळा आमनेसामने आले आहेत. दोन्ही संघांमध्ये निकराची लढत होत आहे. आयसीसी टूर्नामेंटमध्ये जेव्हा जेव्हा टीम इंडिया आणि पाकिस्तानचे संघ एकमेकांशी भिडतात तेव्हा विराट कोहली आणि बाबर आझम आमनेसामने असतात. यादरम्यान दोन्ही फलंदाजांचे रेकॉर्ड उत्कृष्ट राहिले आहेत. या पाच आयसीसी चकमकींमध्ये जेव्हा जेव्हा जास्त धावा करणाऱ्या संघाने विजय मिळवला आहे.

आयसीसी टूर्नामेंटमध्ये विराट कोहली आणि बाबर आझम किती वेळा आले समोरासमोर?

टीम इंडियाचा स्टार फलंदाज विराट कोहलीकडे आता आयसीसी टूर्नामेंटचा प्रचंड अनुभव आहे. त्याचबरोबर पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझमचा अनुभव कोहलीच्या तुलनेत खूपच कमी आहे. असे असले तरी, पाच वेळा हे दोन दिग्गज फलंदाज आयसीसी स्पर्धेच्या सामन्यांमध्ये एकमेकांसमोर आले आहेत. त्या पाचपैकी तीन वेळा टीम इंडियाने बाजी मारली आहे, तर पाकिस्तानच्या टीमने दोनदा बाजी मारली आहे. यात विशेष बाब म्हणजे पाकिस्तानच्या विजयाच्या दोन्ही प्रसंगी बाबर आझमने विराट कोहलीपेक्षा जास्त धावा केल्या आहेत. त्याचवेळी, टीम इंडियाने ज्या तीन सामन्यांमध्ये विजय मिळवला, त्यामध्ये विराट कोहलीने बाबर आझमपेक्षा जास्त धावा केल्या आहेत. म्हणजेच हा आकडा स्वतःच खूप वेगळा आहे.

येथे पहा आकडेवारी

वर्ष 2017: चॅम्पियन्स ट्रॉफी (ग्रुप स्टेज) - विराट कोहली 81 धावा, बाबर आझम 8 धावा (टीम इंडियाचा विजय)

वर्ष 2017: चॅम्पियन्स ट्रॉफी (फायनल) - विराट कोहली 5 धावा, बाबर आझम 46 धावा (पाकिस्तानचा विजय)

वर्ष 2019: एकदिवसीय विश्वचषक - विराट कोहली 77 धावा, बाबर आझम 48 धावा (टीम इंडियाचा विजय)

वर्ष 2021: टी-20 विश्वचषक – विराट कोहली 57 धावा, बाबर आझम 68 धावा (पाकिस्तानचा विजय)

वर्ष 2022: टी-20 विश्वचषक - विराट कोहली 82 धावा, बाबर आझम 0 धावा (टीम इंडियाचा विजय)

विराट कोहली विरुद्ध बाबर आझम

विराट कोहलीने 2011 ते 2019 पर्यंत तीन एकदिवसीय विश्वचषक खेळले आहेत. यादरम्यान किंग कोहलीने 1030 धावा केल्या आहेत. दुसरीकडे, बाबर आझमने केवळ 2019 विश्वचषक खेळला आणि 474 धावा केल्या. याशिवाय विराट कोहली 2008 ते 2022 पर्यंत टी-20 वर्ल्ड कपमध्ये टीम इंडियाचा सतत भाग होता. यादरम्यान विराट कोहलीच्या बॅटमधून 1141 धावा झाल्या आहेत. (हे देखील वाचा: Asia Cup 2023: आशिया चषकासाठी भारतीय खेळाडू राष्ट्रीय क्रिकेट अकादमीमध्ये ठोकणार तळ, 'हे' खेळाडू करणार पुनरागमन)

त्याचबरोबर पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझमने 2016 ते 2022 या कालावधीत टी-20 विश्वचषक खेळताना 427 धावा केल्या आहेत. याशिवाय विराट कोहली 2009, 2013 आणि 2017 अशा एकूण तीन आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीचा भाग आहे आणि त्याच्या नावावर 529 धावा आहेत. दुसरीकडे, बाबर आझमने केवळ 2017 चॅम्पियन्स ट्रॉफी खेळली असून त्याने 133 धावा केल्या आहेत.

(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)

Share Now

Share Now