सचिन तेंडुलकरने नेहमी पहिला बॉल खेळण्यास सौरव गांगुलीला भाग पाडले? माजी कर्णधाराने सांगितलेला धमाल किस्सा ऐकून तुम्हीही नक्कीच हसाल (Watch Video)

सचिन तेंडुलकर आणि सौरव गांगुली यांनी आंतरराष्ट्रीय वनडे क्रिकेटमध्ये टीम इंडियासाठी 176 सामन्यात डावाची सुरुवात केली. पण तुम्हाला माहिती आहे की जेव्हा या दोन खेळाडू डावाची सुरुवात करायचे तेव्हा सचिन नेहमी सौरवला पहिला बॉल खेळायला भाग पाडायचे? गांगुलीने सांगितले,सचिन नेहमीच असे करत असे."

सचिन तेंडुलकर आणि सौरव गांगुली (Photo Credit: Twitter/ICC)

सचिन तेंडुलकर (Sachin Tendulkar) आणि सौरव गांगुली (Sourav Ganguly_ यांनी आंतरराष्ट्रीय वनडे क्रिकेटमध्ये टीम इंडियासाठी (Indian Team) 176 सामन्यात डावाची सुरुवात केली, पण प्रत्येक वेळीस भारताच्या माजी कर्णधाराने डावाच्या पहिल्या चेंडूचा सामना केला. सचिनने 50 ओव्हर क्रिकेटमध्ये दोन विशिष्ट अंधश्रद्धांमुळे पहिला चेंडू खेळला नाही आणि याचा खुलासा खुद्द सचिनचे बॅटिंग पार्टनर गांगुलीने केला. बीसीसीआयचे (BCCI अध्यक्ष गांगुली म्हणाले की, सध्याच्या फॉर्मच्या आधारे सचिनकडे पहिले स्ट्राईक न घेण्यासाठी नेहमी 2 उत्तरे तयार असतात. सचिन तेंडुलकर आणि सौरव गांगुली यांनी वनडे इतिहासातील सर्वात यशस्वी सलामी जोडी आहे. त्यांनी 176 डावात 47.55 च्या सरासरीने सर्वाधिक 6609 धावांची भागीदारी केली आहे. दोंघांमध्ये पहिल्या विकेटसाठी 21 शतकी आणि 23 अर्धशक्ती भागीदारी झाली आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील ही सर्वात यशस्वी भागीदारी आहे. पण तुम्हाला माहिती आहे की जेव्हा या दोन खेळाडू डावाची सुरुवात करायचे तेव्हा सचिन नेहमी सौरवला पहिला बॉल खेळायला भाग पाडायचे? ('IPL मध्ये सचिन तेंडुलकरची विकेट काढल्यावर संघमालकाकडून मिळालं होतं गिफ्ट', डेक्कन चार्जर्स गोलंदाज प्रज्ञान ओझाने सांगितला प्रसंग)

भारतीय कसोटी संघाचा सलामी फलंदाज मयंक अग्रवाल याने सचिनने त्याला प्रथम स्ट्राइक करण्यास भाग पाडले हे खरे आहे का विचारले असतास गांगुलीने एका धमाल किस्सा सांगितला जो ऐकून तुम्हालाही नक्की हसू येईल. गांगुलीने म्हटले, "सचिन नेहमीच असे करत असे. त्याच्याकडे याचे उत्तर असायचे. मी त्याला म्हणायचो की प्रत्येक वेळी कधी तू ही पहिल्या बॉलचा सामना कर प्रत्येक वेळी मी सामना करतो. यावर त्याच्याकडे दोन उत्तरे असायची." सचिनची ही उत्तरे स्पष्ट करताना गांगुली म्हणाले, "पहिले, त्याचा विश्वास होता की त्याचा फॉर्म चांगला चालला आहे, तर तो नॉन-स्ट्राइकरला राहील. आणि जरी त्याचा फॉर्म खराब जात असला तरी तो म्हणायचा की मी नॉन-स्ट्रायकर एंडवर आहे जेणेकरून माझ्यावरील दबाव कमी होऊ शकेल. त्यामुळे त्याच्याकडे चांगल्या आणि वाईट अशा दोन्ही प्रकारच्या फॉर्मसाठी उत्तरे तयार असायची."

याआधी गांगुलीने 2002 नॅटवेस्ट फायनलबद्दलही खास गोष्टी उघड केल्या. या मालिकेत इंग्लंडला भारताने हरवल्यानंतर लॉर्ड्सच्या बाल्कनीत गांगुलीने शर्ट कडून पाडकावल्याचे दृश्य अद्यापही चाहत्यांच्या संस्मरणात आहे. "तो एक चांगला क्षण होता. आम्ही सर्व वाहून गेलो आहोत, परंतु खेळी असाच होता. जेव्हा आपण असा एखादा गेम जिंकता तेव्हा आपण आणखी उत्सव साजरे करता. अशा प्रकारचा खेळ खेळलेल्या महान क्रिकेट संघाचा मी भाग होतो," माजी भारतीय कर्णधार म्हणाला.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement