India Beat Australia: भारताचा उपांत्य फेरीत दिमाखात प्रवेश, ऑस्ट्रेलियाविरुद्ध हे 5 खेळाडू ठरले विजयाचे हिरो
आता उपांत्य फेरीत भारताचा सामना इंग्लंडसोबत 27 जूनला होणार आहे. त्याचवेळी ऑस्ट्रेलियाला उपांत्य फेरी गाठणे आता कठीण झाले आहे. ऑस्ट्रेलियाला आता उपांत्य फेरी गाठण्यासाठी अफगाणिस्तान आणि बांगलादेश यांच्यातील सामन्यावर अवलंबून राहावे लागणार आहे
IND Qualify For Semifinal of ICC T20 World Cup 2024: भारत आणि ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळल्या गेलेल्या सामन्यात टीम इंडियाने बाजी मारली आहे. या सामन्यातील विजयासह टीम इंडियाने उपांत्य फेरीतील आपले स्थान पक्के केले आहे. आता उपांत्य फेरीत भारताचा सामना इंग्लंडसोबत 27 जूनला होणार आहे. त्याचवेळी ऑस्ट्रेलियाला उपांत्य फेरी गाठणे आता कठीण झाले आहे. ऑस्ट्रेलियाला आता उपांत्य फेरी गाठण्यासाठी अफगाणिस्तान आणि बांगलादेश यांच्यातील सामन्यावर अवलंबून राहावे लागणार आहे. जर बांगलादेशने हा सामना जिंकला तर ऑस्ट्रेलियाला उपांत्य फेरी गाठण्याची संधी आहे, या सामन्यात हे 5 खेळाडू टीम इंडियासाठी हिरो बनले. (हे देखील वाचा: Rohit Sharma 100 Meter Six: रोहित शर्माने स्टेडियमच्या छतावर मारला 100 मीटरचा षटकार, प्रेक्षकांची हटली नाही नजर, तुम्हीही पाहा व्हिडिओ)
ऑस्ट्रेलियाविरुद्ध हे 5 खेळाडू ठरले विजयाचे हिरो
रोहित शर्मा (Rohit Sharma)
टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्माने चांगलाच धुमाकूळ घातला. त्याने केवळ 19 चेंडूत अर्धशतक झळकावले. याशिवाय त्याने 41 चेंडूत 92 धावांची स्फोटक खेळी खेळली. त्याच्या खेळीमुळे टीम इंडिया मोठी धावसंख्या उभारण्यात यशस्वी ठरली.
कुलदीप यादव (Kuldeep Yadav)
एक विकेट पडल्यानंतर ट्रॅव्हिस हेड आणि मार्शने ऑस्ट्रेलियाचा डाव सांभाळला. यावेळी तो टीम इंडियापासून सामना काढून घेत होता, तेव्हा कुलदीप यादवने मार्शची विकेट घेत टीम इंडियाला परतवून लावले. याशिवाय धोकादायक दिसत असलेल्या मॅक्सवेललाही त्याने बाद केले.
जसप्रीत बुमराह (Jasprit Bumrah)
जसप्रीत बुमराह पुन्हा एकदा टीम इंडियासाठी हिरो म्हणून समोर आला आहे. त्याने चार षटकात 29 धावा देत 1 बळी घेतला. त्याने धोकादायक ट्रॅव्हिस हेडला बाद करून भारताच्या विजयावर शिक्कामोर्तब केले. त्याने डावाच्या सुरुवातीला ऑस्ट्रेलियन फलंदाजांना वेगवान धावा काढण्याची संधीही दिली नाही.
अक्षर पटेल (Axar Patel)
अक्षर पटेलने आज टीम इंडियासाठी आपली भूमिका चोख बजावली. त्याने 3 षटकात 21 धावा देत 1 बळी घेतला. याशिवाय मार्शचा धोकादायक झेल घेत त्याने टीम इंडियाला सामन्यात परत आणले.
अर्शदीप सिंग (Arshdepp Singh)
अर्शदीप सिंगने या विश्वचषकात टीम इंडियासाठी चमकदार कामगिरी केली होती, त्याने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सामन्यातही तीन महत्त्वपूर्ण विकेट घेतल्या होत्या. त्याच्या स्पेलमध्ये त्याने टीम डेव्हिड, डेव्हिड वॉर्नर आणि वेडच्या विकेट घेतल्या.
(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)