SA 36/2 in 15 Overs | India vs South Africa 2nd Test Day 2 Updates: दक्षिण आफ्रिकेची खराब सुरुवात, 36 धावांवर गमावले 3 विकेट्स 

भारतीय संघ आज दुसऱ्या टेस्टच्या दुसऱ्या दिवशी दक्षिण आफ्रिका संघाविरुद्ध मोठा स्कोर करण्याच्या वाटेवर आहे. दुसऱ्या दिवसाचा खेळ सुरु होताना कर्णधार विराट कोहली आणि उपकर्णधार अजिंक्य रहाणे भारताच्या डावाची सुरुवात करतील. विराट त्याच्या 26 व्या टेस्ट शतकाच्या जवळ आहे.

11 Oct, 23:27 (IST)

पुणे कसोटीचा दुसरा दिवस संपला आहे. दुसर्‍या दिवशी दक्षिण आफ्रिका 565 धावांनी पिछाडीवर आहे. भारताने पहिला डाव 601 धावांवर घोषित केला होता, त्या प्रतिक्रिया म्हणून दक्षिण आफ्रिकेने तीन विकेट गमावल्यानंतर 36 धावा केल्या आहेत. भारताकडून उमेश यादव याने दोन गडी बाद केले तर मोहम्मद शमीने 1 विकेट घेतली. शमीने टेंबा बावुमा याला ओव्हरच्या पहिल्या चेंडूवर 8 धावांवर बाद केले. 

11 Oct, 22:14 (IST)

मोहम्मद शमी पहिल्याच ओव्हरसह आला आणि त्याने पहिल्याच चेंडूवर टेंबा बावुमा ८ धावांवर एलबीडब्ल्यू बाद केले. अंपायरने नॉट आऊट दिल्यावर कर्णधार कोहलीने रिव्यू घेतला आणि निर्णय भारताच्या बाजूने होता.

11 Oct, 21:45 (IST)

पहिल्या डावात फलंदाजी करण्यासाठी आलेल्या आफ्रिकी संघाची सुरुवात खराब झाली. उमेश यादवने डीन एल्गारला बाद करत भारताला दुसरे यश मिळवून दिले. एल्गार 6 धावांवर बोल्ड झाला 

11 Oct, 21:45 (IST)

पहिल्या डावात फलंदाजी करण्यासाठी आलेल्या आफ्रिकी संघाची सुरुवात खराब झाली. उमेश यादवने डीन एल्गारला बाद करत भारताला दुसरे यश मिळवून दिले. एल्गार 6 धावांवर बोल्ड झाला 

11 Oct, 21:30 (IST)

दक्षिण आफ्रिकेला पहिल्या डावाच्या सुरुवातीला मोठा धक्का बसला. एडन मार्क्रम शून्यावर बाद झाला. उमेश यादव ने त्याला स्वस्तात माघारी धाडले आणि भारताला पहिले यश मिळवून दिले. 

11 Oct, 21:11 (IST)

सेनुरन मुथुस्वामीच्या षटकांच्या चौथ्या चेंडूवर विराट कोहलीने चौकार ठोकला आणि कसोटीतील सर्वोत्तम धावाही बनविल्या. या सामन्याच्या पहिल्या कसोटी प्रकारात त्याने सर्वाधिक धावा केल्या त्या श्रीलंकेविरुद्ध त्याने 243 धावा केल्या. या सामन्यात त्याने 155 षटकांनंतर 246 धावा केल्या आहेत.

11 Oct, 20:42 (IST)

विराट कोहलीच्या दुहेरी शतकानंतर रवींद्र जडेजानेही अर्धशतक पूर्ण केले. एडन मार्क्रामच्या चेंडूवर 2 धावा काढून त्याने 12 वे कसोटी अर्धशतक पूर्ण केले.

11 Oct, 20:35 (IST)

भारताची धावसंख्या 500 च्या वर गेली. टीम इंडियाने सलग दुसर्‍या कसोटीत 500 धावांची धावसंख्या ओलांडली आहे. रवींद्र जडेजा देखील अर्धशतकाच्या दिशेने प्रगती करीत आहे. भारत त्यांचा पहिला डाव कधी घोषित करतो हे पाहण्यासारखे आहे. आता भारताकडून कसोटीत सर्वाधिक दुहेरी शतक ठोकण्याचा विक्रम कोहलीच्या नावावर आहे.

11 Oct, 20:35 (IST)

भारताची धावसंख्या 500 च्या वर गेली. टीम इंडियाने सलग दुसर्‍या कसोटीत 500 धावांची धावसंख्या ओलांडली आहे. रवींद्र जडेजा देखील अर्धशतकाच्या दिशेने प्रगती करीत आहे. भारत त्यांचा पहिला डाव कधी घोषित करतो हे पाहण्यासारखे आहे. आता भारताकडून कसोटीत सर्वाधिक दुहेरी शतक ठोकण्याचा विक्रम कोहलीच्या नावावर आहे.

11 Oct, 20:20 (IST)

कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा केल्याने कोहलीने ब्रॅडमन यांना मागे टाकले आहे. ब्रॅडमन यांनी कसोटीत 6996 धावा केल्या. कोहलीने आता त्यांना मागे टाकले आहे. 

11 Oct, 19:50 (IST)

पुणे कसोटीच्या दुसर्‍या दिवसापर्यंत भारताने चार विकेट्स गमावत 473 धावा केल्या आहेत. भारतीय कर्णधार विराट कोहली 194 आणि रवींद्र जडेजाने 25 धावा करून क्रीजवर उपस्थित आहे.

11 Oct, 19:33 (IST)

विराट कोहली दुहेरी शतकाच्या जवळ पोहचला आहे. सध्या कोहली 192 धावांवर खेळत आहे. रवींद्र जडेजा आणि कोहली यांच्यात 116 चेंडूत 76 धावांची भागीदारी केली.

11 Oct, 18:33 (IST)

विराट कोहलीच्या शतकी खेळीच्या जोरावर भारताने 400 धावांचा टप्पा ओलांडला. यासह विराटने दीडशे धावादेखील पूर्ण केल्या. विराटने 241 चेंडूत 151 धावा केल्या. लंचनंतर भारताने अजिंक्य रहाणेची विकेट गमावली. 

11 Oct, 18:02 (IST)

लंचनंतरचा खेळ सुरु झाला आहे आणि भारताला सुरुवातीलाच मोठा झटका बसला. उपकर्णधार अजिंक्य रहाणे 59 धावांवर आऊट झाला. केशव महाराज याने रहाणेला बाद करत टेस्ट मधील 100 विकेट पूर्ण केल्या. 

11 Oct, 16:56 (IST)

भारतीय कर्णधार विराट कोहलीने वर्नोन फिलेंडरच्या चौथ्या चेंडूवर लाँग ऑनवर चौकार ठोकला आणि शतक पूर्ण केले. त्याने 173 चेंडूत 16 चौकारांच्या मदतीने 100 धावा पूर्ण केल्या. कसोटी क्रिकेटमधील हे कोहलीचे 26 वे शतक आहे. कर्णधार म्हणून विराटचे हे 19 वे शतक आहे. विराट कर्णधार म्हणून आपला 50 वा कसोटी सामना खेळत आहे.

11 Oct, 16:56 (IST)

भारतीय कर्णधार विराट कोहलीने वर्नोन फिलेंडरच्या चौथ्या चेंडूवर लाँग ऑनवर चौकार ठोकला आणि शतक पूर्ण केले. त्याने 173 चेंडूत 16 चौकारांच्या मदतीने 100 धावा पूर्ण केल्या. कसोटी क्रिकेटमधील हे कोहलीचे 26 वे शतक आहे. कर्णधार म्हणून विराटचे हे 19 वे शतक आहे. विराट कर्णधार म्हणून आपला 50 वा कसोटी सामना खेळत आहे.

11 Oct, 16:36 (IST)

टीम इंडियाच्या टेस्ट संघाचा उपकर्णधार अजिंक्य रहाणे याने 20 वे अर्धशतक पूर्ण केले. एनरिच नॉर्टजे याच्या ओव्हरच्या पहिल्याच चेंडूवर एक धाव घेत रहाणेने आपले अर्धशतक पूर्ण केले. रहाणेने 141 चेंडूत अर्धशतक पूर्ण केले. आणि सध्या कर्णधार विराट कोहली त्याच्या शतकाच्या जवळ पोहचला आहे. 

11 Oct, 16:31 (IST)

104 ओव्हरचा खेळ पूर्ण झाला आहे. विराट कोहली 94 धावा काढून शतकाच्या जवळ आहे तर अजिंक्य रहाणेने 48 धावा केल्या असून अर्धशतक पूर्ण करणार आहे.

11 Oct, 15:53 (IST)

दक्षिण आफ्रिकाविरुद्ध दुसऱ्या टेस्टच्या दुसऱ्या दिवसाचा खेळ सुरु होण्याच्या काही क्षणात भारताने धावांचे तिहेरी शतक पूर्ण केले. यादरम्यान, विराट कोहली देखील आपल्या २६ व्या टेस्ट शतकाच्या जवळ पोहचला आहे. तर अजिंक्य राहणे नाबाद 26 धावा करत कोहलीला साथ देत आहे. 

11 Oct, 15:49 (IST)

कर्णधार विराट कोहली आणि टेस्ट उपकर्णधार अजिंक्य रहाणे यांनी दक्षिण आफ्रिकाविरुद्ध दुसऱ्या टेस्टच्या दुसऱ्या दिवशी सुरवातीलाच 100 धावांची भागीदारी केली. कोहली आणि रहाणेने 212 चेंडूत 100 धावांची भागीदारी केली. यासह टीम इंडिया मोठा स्कोर करण्याच्या वाटेवर आहे. 

Read more


भारतीय संघ (Indian Team) आज दुसऱ्या टेस्टच्या दुसऱ्या दिवशी दक्षिण आफ्रिका (South Africa) संघाविरुद्ध मोठा स्कोर करण्याच्या वाटेवर आहे. पहिल्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा टीम इंडियाने 3 बाद 273 धावा  होत्या. सलामीवीर मयंक अग्रवाल (Mayank Agrawal) याने आपला शानदार फॉर्म कायम ठेवला आणि पहिल्याच दिवशी शतकी खेळी करत संघाला मोठा स्कोर करण्यास सहाय्य केले. अग्रवालने 195 चेंडूत 108 धावा केल्या आणि कगिसो रबाडाच्या चेंडूवर माघारी परतला. यापूर्वी विशाखापट्टणम येथे झालेल्या पहिल्या कसोटी सामन्यात त्याने 215 धावा केल्या होत्या. आता दुसऱ्या दिवसाचा खेळ सुरु होताना कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) आणि उपकर्णधार अजिंक्य रहाणे (Ajinkya Rahane) भारताच्या डावाची सुरुवात करतील. विराट त्याच्या 26 व्या टेस्ट शतकाच्या जवळ आहे राहणे त्याचे अर्धशतक पूर्ण करू शकतो. विराटने रहाणेबरोबर चौथ्या विकेटसाठी 75 धावांची भागीदारी केली आहे.

पहिल्या दिवशी टीम इंडियाने टॉस जिंकून फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पण, संघाची सुरुवात काही चांगली झाली नाही. रोहित शर्मा 14 धावा करून लवकर बाद झाला. त्यानंतर, अग्रवालने दुसर्‍या विकेटसाठी चेतेश्वर पुजारा सह 138 धावांची भागीदारी केली. पुजारा 58 धावा करून बाद झाला. दक्षिण आफ्रिकेने पहिल्या दिवशी भारताचे तीन गडी बाद केले. विशेष म्हणजे तेंही विकेट रबाडाने घेतल्या. सुरुवातीच्या सत्रात दक्षिण आफ्रिकेच्या गोलंदाजांनी अधिक चांगला लय दाखवत गोलंदाजी केली आणि भारतीय फलंदाजांना मुक्तपणे खेळू दिले नाही. विशेषत: रबाडाने त्याच्या गोलंदाजीने प्रभावित केले.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement