IND vs ENG T20I 2021: फक्त 72 धावा आणि आंतरराष्ट्रीय टी-20 सामन्यात Virat Kohli ‘या’ विश्वविक्रमासह रुचणार इतिहास

विराट कोहली आंतरराष्ट्रीय टी-20 मध्ये 79 डावांमध्ये 2,928 धावाांसह सर्वाधिक धावा करणारा फलंदाज आहे. आता, अहमदाबादच्या मोटेरा स्टेडियमवर 12 मार्च रोजी इंग्लंडविरुद्ध पहिल्या टी-20 सामन्यात त्याने 72 धावा केल्या तर आंतराष्ट्रीय टी-20 सामन्यात 3,000 धावा करणारा तो पहिला फलंदाज ठरेल.

विराट कोहली (Photo Credit: PTI)

IND vs ENG T20I 2021: विराट कोहली (Virat Kohli) आंतरराष्ट्रीय टी-20 मध्ये 79 डावांमध्ये 2,928 धावाांसह सर्वाधिक धावा करणारा फलंदाज आहे. आता, अहमदाबादच्या मोटेरा स्टेडियमवर 12 मार्च रोजी इंग्लंडविरुद्ध (England) पहिल्या टी-20 सामन्यात त्याने 72 धावा केल्या तर आंतराष्ट्रीय टी-20 सामन्यात 3,000 धावा करणारा तो पहिला फलंदाज ठरेल. ऑक्टोबरमध्ये आयसीसी टी-20 विश्वचषक स्पर्धेच्या संभाव्य संयोजनाची कसोटी घेण्यासाठी भारत पाच सामन्यांची मालिका खेळत असल्याने कोहलीने पहिल्या दोन सामन्यांमध्ये मैलाचा दगड गाठण्याची अपेक्षित आहे. स्टाईलिश फलंदाजाने टी-20 क्रिकेटमध्ये यापूर्वी 9,500 धावा केल्या आहेत आणि 9 एप्रिलपासून सुरू होणाऱ्या इंडियन प्रीमियर (Indian Premier League) टी-20 लीगमध्ये तो 10,000 धावांच्या क्लबमध्ये सामील होऊ शकतो. विराट आयपीएलमध्ये (IPL) पुन्हा एकदा आयपीएलमध्ये रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरचे नेतृत्व करताना दिसेल. (IND vs ENG T20 Series 2021: विराट कोहली आणि रोहित शर्मा यांच्यात टी-20 क्रिकेटमध्ये ‘या’ खास रेकॉर्डसाठी रंगणार चढाओढ)

दुसरीकडे, मर्यादित षटकांत भारताचा उपकर्णधार रोहित शर्मा मालिकेमध्ये 227 धावा केल्यास तर त्यालाही 3,000 आंतरराष्ट्रीय धावांचा टप्पा गाठण्याची सुवर्ण संधी आहे. 100 डावांमध्ये2,773 धावा घेऊन तो टी-20 मध्ये सर्वाधिक धावा करणारा भारताचा दुसरा फलंदाज आहे. न्यूझीलंडचा मार्टिन गप्टिल टी-20 क्रिकेटमध्ये कोहलीच्या मागे 2,839 धावांसह जगातील दुसर्‍या क्रमांकावरील फलंदाज आहे. विशेष म्हणजे, आंतरराष्ट्रीय टी-20 क्रिकेटमध्ये विराटची फलंदाजीची सरासरी 50 पेक्षा जास्त आहे आणि याबाबतीत तो जगातील एकमेव फलंदाज आहे. विराटने आंतरराष्ट्रीय टी-20 क्रिकेटमध्ये 81 डावात संयुक्तपणे 25 अर्धशतके झळकावली आहेत.

दरम्यान, आयसीसी वर्ल्ड टी-20 क्रमवारीत भारत 268 गुणांसह तिसऱ्या क्रमांकावर असून त्यांना अव्वल स्थान पटकावण्याची संधी आहे. 275 गुणांसह इंग्लंड टी-20 क्रमवारीत पहिल्या स्थानावर असून आहे, परंतु यजमान संघाने इंग्लंडविरुद्ध पाच सामन्यांची मालिका 4-1 अशी जिंकल्यास पाहुण्या संघाला मागे टाकून अव्वल स्थान पटकावले. शिवाय, इंग्लंडविरुद्ध आगमन टी-20 मालिका भारताने जिंकली तर ती सलग 7वी टी-20 मालिका जिंकेल. 2019 मध्ये वेस्ट इंडीजविरुद्ध खेळल्या गेलेल्या टी-20 मालिकेपासून आतापर्यंत टीम इंडियाने सलग 6 मालिका जिंकल्या आहेत.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement