IND vs AUS Test Record: ऑस्ट्रेलियात भारताची कशी आहे कामगिरी? आतापर्यंत भारताने किती जिंकले सामने? जाणून घ्या कसोटी इतिहास

टीम इंडियाने आजपर्यंत ऑस्ट्रेलियामध्ये कोणत्याही मालिकेत 2 पेक्षा जास्त सामने जिंकलेले नाहीत. घरच्या मैदानावर 3-0 असा पराभव पत्करलेल्या टीम इंडियाकडून या वेळी ऐतिहासिक कामगिरीची अपेक्षा करणे स्वप्नवत वाटत आहे. मात्र, 2018-19 मध्ये टीम इंडियाने पहिल्यांदाच कसोटी मालिका जिंकली तेव्हाही कुणाला याची अपेक्षा नव्हती.

Team India (Photo Credit - X)

Border-Gavaskar Trophy 2024-25: जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीत पोहोचण्यासाठी भारतीय संघाला ऑस्ट्रेलियात 4-1 असा विजय आवश्यक आहे. टीम इंडियाने आजपर्यंत ऑस्ट्रेलियामध्ये कोणत्याही मालिकेत 2 पेक्षा जास्त सामने जिंकलेले नाहीत. घरच्या मैदानावर 3-0 असा पराभव पत्करलेल्या टीम इंडियाकडून या वेळी ऐतिहासिक कामगिरीची अपेक्षा करणे स्वप्नवत वाटत आहे. मात्र, 2018-19 मध्ये टीम इंडियाने पहिल्यांदाच कसोटी मालिका जिंकली तेव्हाही कुणाला याची अपेक्षा नव्हती. ऑस्ट्रेलियात भारताची आकडेवारी कशी आहे आणि भारताने किती सामने जिंकले ते पाहू. (हे देखील वाचा: Gautam Gambhir on Ricky Ponting: पाँटिंगचा भारतीय क्रिकेटशी काय संबंध? कोहलीवर टिप्पणी करणाऱ्या ऑस्ट्रेलियाच्या माजी कर्णधाराला गंभीरचे चोख प्रत्युत्तर)

ऑस्ट्रेलियात भारताची कशी आहे आकडेवारी?

भारतीय संघाने 1947-48 मध्ये पहिल्यांदा ऑस्ट्रेलियाचा दौरा केला होता. टीम इंडियाला 5 सामन्यांच्या मालिकेत 4-0 असा पराभव स्वीकारावा लागला होता. ऑस्ट्रेलियाविरुद्ध भारताचा पहिला विजय 1959-60 मालिकेत मिळाला होता पण ही मालिका भारतात खेळली गेली. ऑस्ट्रेलियाच्या भूमीवर पहिल्या विजयासाठी भारताला जवळपास 30 वर्षे वाट पहावी लागली आणि 1977-78 मध्ये भारताने 5 सामन्यांच्या मालिकेपैकी 2 जिंकले परंतु 3 गमावले आणि मालिका गमावली. भारताने 1980-81 कसोटी मालिका 1-1 अशी बरोबरीत सोडवली. टीम इंडियाने ऑस्ट्रेलियात कसोटी मालिका न गमावण्याची ही पहिलीच वेळ होती.

2018-19 मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध प्रथमच मिळवला विजय

2018-19 मध्ये, भारतीय संघाने विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली ऑस्ट्रेलियाविरुद्ध पहिली मालिका जिंकली. भारताने 4 सामन्यांची मालिका 2-1 ने जिंकली. 2020-21 मध्ये भारताने पुन्हा ऑस्ट्रेलियाचा दौरा केला तेव्हा त्याच फरकाने मालिका जिंकली. हा मालिका विजय पूर्वीपेक्षा अधिक खास होता कारण या दौऱ्यातील पहिल्या सामन्यात टीम इंडिया अवघ्या 36 धावांत गारद झाली होती. त्यानंतर विराट आणि कंपनीने शानदार पुनरागमन करत मालिका 2-1 अशी खिशात घातली.

ऑस्ट्रेलियात 4-0 असा विजय मिळवणे कठीण 

यावेळी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीत पोहोचण्यासाठी टीम इंडियाला बॉर्डर गावस्कर ट्रॉफीमध्ये 4 सामने जिंकणे आवश्यक आहे. प्रश्न असा आहे की, ज्या संघाला आजपर्यंत एका दौऱ्यात 3 सामनेही जिंकता आलेले नाहीत, त्या संघाकडून 4 सामने जिंकण्याची अपेक्षा करणे अप्रामाणिक नाही का? भारताने अनेकवेळा ऑस्ट्रेलियाला घरच्या मैदानावर 4-0 ने पराभूत केले असले तरी ऑस्ट्रेलियाचा एवढा मोठा विजय हे केवळ स्वप्नच वाटत आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement