IND vs BAN Head to Head: विश्वचषकामध्ये बांगलादेशविरुद्ध भारताचा रेकॉर्ड किती आहे चांगला? जाणून घ्या हेड टू हेड आकडेवारी
12 वर्षांपूर्वी घरच्या मैदानावर खेळलेल्या 2011 विश्वचषकाचे विजेतेपद भारताने पटकावले होते. अशा स्थितीत यावेळी 2023 च्या विश्वचषक विजेतेपदाचा प्रबळ दावेदार मानला जात आहे. यावेळी रोहित शर्माच्या (Rohit Sharma) नेतृत्वाखाली टीम इंडिया (Team India) आयसीसी ट्रॉफीचा दुष्काळ संपवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार आहे.
भारत आणि बांगलादेश (IND vs BAN) यांच्यात विश्वचषक 2023 चा (ICC Cricket World Cup 2023) सामना गुरूवार 19 ऑक्टोबर रोजी पुण्यातील MCA स्टेडियमवर होणार आहे. यंदाचा विश्वचषक जिंकण्यासाठी आणि बांगलादेशविरुद्धही विजय मिळवण्यासाठी भारत प्रबळ दावेदार मानला जात आहे. 12 वर्षांपूर्वी घरच्या मैदानावर खेळलेल्या 2011 विश्वचषकाचे विजेतेपद भारताने पटकावले होते. अशा स्थितीत यावेळी 2023 च्या विश्वचषक विजेतेपदाचा प्रबळ दावेदार मानला जात आहे. यावेळी रोहित शर्माच्या (Rohit Sharma) नेतृत्वाखाली टीम इंडिया (Team India) आयसीसी ट्रॉफीचा दुष्काळ संपवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार आहे. (हे देखील वाचा: IND vs BAN ICC World Cup 2023: गुरुवारी भारत भिडणार बांगलादेशसोबत, पुण्यातील मैदानात टीम इंडियाची कशी आहे कामगिरी? आकडेवारीवर एक नजर)
भारत - बांगलादेश हेड टू हेड रेकॉर्ड ?
विश्वचषक 2023 बद्दल बोलायचे झाले तर बांगलादेशविरुद्ध भारताचा रेकॉर्ड चांगला आहे. एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेत भारत आणि बांगलादेश यांच्यात आतापर्यंत 4 सामने खेळले गेले आहेत, ज्यापैकी भारताने 3 सामने जिंकले आहेत तर बांगलादेशने एक सामना जिंकला आहे. 2011, 2015 आणि 2019 च्या एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेत भारताने बांगलादेशचा पराभव केला आहे. त्याच वेळी, बांगलादेशने 2007 च्या एकदिवसीय विश्वचषकात भारताचा पराभव करून त्यांना स्पर्धेतून बाहेर फेकले होते, त्यानंतर सचिन तेंडुलकर ते वीरेंद्र सेहवाग आणि राहुल द्रविड सारख्या दिग्गजांनी निराशा केली होती.
भारत आणि बांगलादेश यांच्यातील विश्वचषक सामन्यांचे निकाल
1. भारत विरुद्ध बांगलादेश - 2007 विश्वचषक - बांगलादेश 5 गडी राखून जिंकला
2. भारत विरुद्ध बांगलादेश - 2011 विश्वचषक - भारत 87 धावांनी जिंकला
3. भारत विरुद्ध बांगलादेश - 2015 विश्वचषक - भारत 109 धावांनी जिंकला
4. भारत विरुद्ध बांगलादेश - 2019 विश्वचषक - भारत 28 धावांनी जिंकला
भारत आणि बांगलादेशचे एकदिवसीय रेकॉर्ड
भारत आणि बांगलादेशने आतापर्यंत एकमेकांविरुद्ध 40 एकदिवसीय सामने खेळले आहेत, ज्यापैकी टीम इंडियाने 31 एकदिवसीय सामने जिंकले आहेत. बांगलादेशबद्दल बोलायचे झाले तर भारताविरुद्ध 8 वनडे सामने जिंकले आहेत, तर एका सामन्याचा निकाल लागला नाही. 27 ऑक्टोबर 1988 रोजी भारत आणि बांगलादेश यांच्यात पहिला एकदिवसीय सामना खेळला गेला, ज्यामध्ये भारताने 9 विकेट्सने विजय मिळवला.
(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)