‘Virat Kohli चे राहुल द्रविडशी संबंध दीर्घकाळ चांगले राहतील वाटत नाही,’ जाणून घ्या असे का म्हणाला माजी पाकिस्तानी क्रिकेटर
अनिल कुंबळे आणि सौरव गांगुली यांच्याशी झालेल्या मतभेदांमुळे विराट कोहली मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड यांच्याशी दीर्घकाळ फलदायी संबंध ठेवेल असे पाकिस्तानी क्रिकेटर दानिश कनेरियाला याला वाटत नाही. यापूर्वी कुंबळेसोबत आणि आता त्याला सौगांगुलीसोबत काय समस्या आहेत यावर कनेरियाने प्रकाश टाकला. तसेच वनडे कर्णधार बदलाचा वाद ज्या पद्धतीने उलगडला त्याबद्दल कनेरियानेही कोहलीला फटकारले.
मैदानावरील कामगिरी असो किंवा मैदानाबाहेरची बडबड असो, विराट कोहलीला (Virat Kohli) चर्चेपासून दूर ठेवणे कठीण आहे. टीम इंडियाचा (Team India) वनडे कर्णधार म्हणून काढून टाकल्यानंतर भारताचा कसोटी कर्णधार पुन्हा चर्चेत आला ज्यामुळे मोठा वाद निर्माण झाला. कोहली आणि बीसीसीआय (BCCI) यांच्यातील कोल्ड-वॉरने अनेक माजी क्रिकेटपटूंची मते आकर्षित करत आहेत. पाकिस्तानचा माजी फिरकीपटू दानिश कनेरियानेही (Danish Kaneria) या वादात उडी घेतली असून म्हणाला की कोहलीला यापूर्वी अनिल कुंबळेसोबत समस्या होत्या आणि आता तो सौरव गांगुलीसारख्या दिग्गजाच्या विरोधात बोलत आहे. “दोन वर्षे झाली, विराटने एकही शतक झळकावलेले नाही, त्यामुळे त्याला त्याच्या खेळावर लक्ष केंद्रित करण्याची गरज आहे. सौरव गांगुली आणि इतर कोणाच्या विरोधात बोलणे त्याला मदत करणार नाही,” कनेरियाने IANS ला दिलेल्या मुलाखतीत सांगितले. (Year-Ender 2021: विराट कोहली याच्यासाठी 2021 वर्ष ठरले विस्मरणीय; एकही शतक ठोकले नाही तर दोन ICC ट्रॉफी देखील हातून गमावल्या)
याशिवाय कोहली आणि द्रविडसोबतच्या त्याच्या नात्याबद्दल कनेरियाने सांगितले की, या दोघांमध्ये दीर्घकाळ घट्ट बंध असतील असे त्याला अपेक्षित नाही. “जोपर्यंत रोहित शर्माचा संबंध आहे तो खेळाचा उत्कृष्ट अॅम्बेसेडर आहे; त्याने पाच आयपीएल ट्रॉफी जिंकल्या आहेत. त्याचे कर्णधारपद निर्दोष आहे; राहुल द्रविडसोबतची त्याची मैत्री अप्रतिम आहे. मला वाटत नाही की विराट कोहली आणि द्रविडचे संबंध दीर्घकाळ चांगले असतील. विराटला अनिल कुंबळेसोबतही समस्या होती. कुंबळे आणि द्रविड दोघेही दक्षिण भारतातून येतात आणि क्रिकेटमध्ये त्यांचा मोठा दर्जा आहे. मी त्या दोघांविरुद्ध खेळलो, आणि ते कोणत्या प्रकारचे बुद्धिजीवी आहेत हे मला माहीत आहे,” माजी लेग स्पिनर म्हणाला.
दुसरीकडे, माजी पाकिस्तानी लेग स्पिनरने कबूल केले की द्रविड, व्हीव्हीएस लक्ष्मण आणि स्फोटक सलामीवीर वीरेंद्र सेहवाग यांसारख्या भारतीय फलंदाजांविरुद्ध गोलंदाजी करताना त्याला अडचणींचा सामना करावा लागला. 61 कसोटी सामने खेळणाऱ्या कनेरियाने सांगितले की, भारताकडे चांगले क्रिकेटपटू आहेत. रोहित शर्मा, केएल राहुल, रुतुराज गायकवाड, मयंक अग्रवाल आणि अगदी प्रियांक पांचालही चांगली कामगिरी करत आहेत. भारताकडे प्रत्येक स्थानासाठी बॅकअप खेळाडू आहेत. रिषभ पंतसारखे खेळाडू चांगली कामगिरी करत नसतील तर केएस भरत आणि रिद्धिमान साहा तयार आहेत.
(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)