Coronavirus Lockdown: सौरव गांगुली ने पुढे केला मदतीचा हात; गरीबांमध्ये वाटणार 50 लाख रुपयांचे तांदूळ, क्वारंटाइनसाठी स्टेडियमचा वापर करण्याची दिली ऑफर
बीसीसीआयचे अध्यक्ष सौरव गांगुली कोविड-19 साथीच्या आजारामुळे 21 दिवसांच्या लॉकडाऊनने बाधित झालेल्यांच्या समर्थनार्थ पुढे आले आहेत आणि वंचित असलेल्यांसाठी 50 लाख रुपयांचे तांदूळ दान देण्याचे वचन दिले. यापूर्वी गांगुलीनेराज्य सरकारसमोर कोरोना संबंधित लोकांना क्वारंटाइनमध्ये ठेवण्यासाठी ईडन गार्डन्स स्टेडियम वापरण्याची ऑफर देखील दिली आहे.
बीसीसीआयचे अध्यक्ष सौरव गांगुली (Sourav Ganguly) कोविड-19 (COVID-19) साथीच्या आजारामुळे 21 दिवसांच्या लॉकडाऊनने बाधित झालेल्यांच्या समर्थनार्थ पुढे आले आहेत आणि वंचित असलेल्यांसाठी 50 लाख रुपयांचे तांदूळ दान देण्याचे वचन दिले. बंगाल क्रिकेट असोसिएशनच्या (CAB) निवेदनात जाहीर करण्यात आले आहे की सुरक्षेच्या कारणास्तव सरकारी शाळांमध्ये ठेवलेल्या गरजू लोकांना लालबाई तांदूळ यांच्यासह गांगुली तांदूळ दान करेल. "आशा आहे की, गांगुलीच्या पुढाकाराने राज्यातील इतर नागरिकांनाही आपल्या राज्यातील जनतेची सेवा करण्यासाठी अशीच पावले उचलण्याची प्रेरणा मिळेल,"कंपनीने त्यांच्या विधानात म्हटले. 1.3 अब्ज लोकसंख्या असलेला भारत कोविड-19 चा प्रसार कमी करण्याच्या प्रयत्नात 26 मार्चच्या मध्यरात्रीपासून संपूर्ण लॉकडाऊनमध्ये गेला आहे आणि सीएबी सचिव स्नेहाशीस गांगुली यांनी या अभूतपूर्व पावलाचे कौतुक केले. जगभरात दुसरी सर्वाधिक लोकसंख्या असलेल्या देशात कोरोना व्हायरसची संपूर्ण भारतात 600 प्रकरणांची पुष्टी झाली असून 10 मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. (COVID-19 पासून बचाव करण्यासाठी इरफान आणि युसूफ पठाण यांनी घेतला पुढाकार, 4,000 मास्क केले दान Watch Video)
यापूर्वी बंगाल क्रिकेट असोसिएशनने पश्चिम बंगाल (West Bengal) सरकारला कोरोनाचा सामना करण्यासाठी 25 लाख रुपयांचे अनुदान देण्याचा निर्णय घेतला होता. सीएबी अध्यक्ष अभिषेक दालमिया यांनीही स्वतः तर्फे राज्य सरकारच्या रिलीफ फंडमध्ये मदत करण्याचे जाहीर केले होते. दुसरीकडे, गांगुली बीसीसीआयचे प्रमुख तसेच बंगाल क्रिकेट असोसिएशनचे माजी अध्यक्ष आहेत. त्यांनी ममता बॅनर्जी यांच्या नेतृत्वात असलेल्या राज्य सरकारसमोर कोरोना संबंधित लोकांना क्वारंटाइनमध्ये ठेवण्यासाठी ईडन गार्डन्स स्टेडियम वापरण्याची ऑफर देखील दिली आहे. गांगुली यांनी आपल्या निवेदनात म्हटले आहे की, "सरकारने जर आम्हाला विचारले तर आम्ही स्टेडियम क्वारंटाइन सुविधेसाठी उपलब्ध करुन देऊ. आम्ही आवश्यक असलेले कोणतेही सामान प्रदान करू. आम्हाला यात कोणतीही अडचण नाही."
गांगुली सतत सोशल मीडियाच्या माध्यमातून लोकांना कोरोना विषाणूंपासून सावध राहण्याचा सल्ला देत आहे. देशभरात लॉकडाउन जाहीर झाल्यानंतर लोकांनी त्याचे अनुसरण करण्याचे आवाहनही गांगुली यांनी केले. गांगुलीने सर्वांना आपापल्या घरीच रहाण्याचे आवाहन केले आहे. कोरोनाचा धोका लक्षात घेता ते म्हणाले की जगातील नागरिकांनी त्यांच्या सरकारला सहकार्य करावा.
(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)