अंबाती रायुडू च्या भ्रष्टाचाराच्या आरोपावर मोहम्मद अजहरुद्दीन ने तोडले मौन, 'हताश क्रिकेटर'च्या टीकेनंतर रायुडू ने फटकारले
अंबाती रायुडूने केलेल्या ट्विटनंतर एचसीएचे अध्यक्ष मोहम्मद अझरुद्दीनने मौन तोडले. निराश खेळाडू म्हणून रायुडूच्या भ्रष्टाचाराच्या विधानांना अझरुद्दीननदी फेटाळून लावले आहे. रायुडू सोशल मीडियावर कमी पोस्ट करतो पण त्याने अझरुद्दीनच्या प्रतिक्रियेवर फटकारले आहे. हताश क्रिकेटरच्या विधानावर त्याने हा मुद्दा खासगी न करण्याचा सल्ला माजी भारतीय कर्णधाराला दिला आहे.
भारतीय क्रिकेटपटू अंबाती रायुडू (Ambati Rayudu) पुन्हा एकदा वादात सापडला आहे. विश्वचषकात निवड न झाल्याने त्याने निवृत्तीची घोषणा केली, पण काही महिन्यांनंतर त्याने क्रिकेटमध्ये पुनरागमन केले. हैदराबाद क्रिकेट (Hyderabad Cricket) असोसिएशनच्या निवड समितीचे अध्यक्ष आरए स्वरूप यांना त्याने रणजी ट्रॉफीमध्ये न खेळण्याबाबत पत्र लिहिले आहे.आणि नंतर हैदराबाद क्रिकेटमध्ये भ्रष्टाचाराचा आरोप करत त्याने केलेल्या ट्विटने भारतीय क्रिकेट विश्वात खळबळ निर्माण केली आहे. रायुडूने तेलंगणा सरकारचे उद्योग आणि नागरी प्रशासन मंत्री के.टी. रामाराव यांना ट्विट केले आणि हैदराबाद क्रिकेटमधील भ्रष्टाचारात हस्तक्षेप करण्याची मागणी त्याने मंत्र्यांकडे केली आहे.हैदराबाद क्रिकेट असोसिएशनमधील भ्रष्टाचाराचे प्रलंबित प्रकरण आणि भ्रष्टाचार करणार्यांविरोधात तेलंगणाचे मंत्रींना रायुडूने केलेल्या ट्विटनंतर एचसीएचे अध्यक्ष आणि माजी क्रिकेटपटू मोहम्मद अझरुद्दीन (Mohammad Azharuddin) यांनी मौन तोडले. निराश खेळाडू म्हणून रायुडूच्या भ्रष्टाचाराच्या विधानांना अझरुद्दीननदी फेटाळून लावले आहे. (निवृत्तीतून परतलेल्या अंबाती रायुडू याने उघडला स्वतःच्या टीमविरूद्ध मोर्चा, हैदराबाद क्रिकेटवर केला भ्रष्टाचाराचा आरोप)
अझरुद्दीन म्हणाले की, 'रायुडू निराश खेळाडू आहे.' अलीकडेच अझरुद्दीनची हैदराबाद क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष म्हणून निवड झाली असून रायुडूनेही प्रत्युत्तर म्हणून प्रथम श्रेणी क्रिकेट न खेळण्याची घोषणा केली आहे. रायुडू सोशल मीडियावर कमी पोस्ट करतो पण त्याने अझरुद्दीनच्या प्रतिक्रियेवर फटकारले आहे. हताश क्रिकेटरच्या विधानावर त्याने हा मुद्दा खासगी न करण्याचा सल्ला माजी भारतीय कर्णधाराला दिला आहे. त्याने ट्विटरवर लिहिले, "नमस्कार मोहम्मद अझरुद्दीन, ते खाजगी करू नका. हा मुद्दा आपल्यापेक्षा मोठा आहे. आपल्या दोघांनाही माहिती आहे की एचसीएमध्ये काय चालले आहे. आपल्याकडे हैदराबाद क्रिकेट स्वच्छ करण्याची मोठी संधी आहे. मी तुम्हाला कुटिल लोकांपासून दूर राहण्याचा सल्ला देतो. आपण भविष्यातील क्रिकेटपटूंना वाचवू शकता."
रायुडूनेही यापूर्वी असेच केले आहे. भारतीय टीम विश्वचषक संघात निवड न झाल्याबद्दल त्यांनी निवड समितीवर निशाणा साधला होता. विश्वचषकात शिखर धवन याला दुखापत झाल्यानंतरही रायुडूचा संघात समावेश झाला नाही आणि त्याने निराश होऊन आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली. काही काळानंतर त्याला हा निर्णय चुकीचा वाटलं आणि त्यानंतर त्याने परत क्रिकेट खेळायला सुरुवात केली.
(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)