ENG विरुद्धच्या दारुण पराभवानंतर Sachin Tendulkar ने दिले पहिले विधान, म्हणाला - खेळात चढ-उतार येतच राहतात

इंग्लंडविरुद्धच्या दारूण पराभवानंतर क्रिकेटचा देव सचिन तेंडुलकरने (Sachin Tendulkar) पहिलं विधान केलं आहे. त्याने टीम इंडियासाठी (Team India) मोठी गोष्ट सांगितली आहे.

Sachin Tendulkar (Photo Credit - Twitter)

भारतीय संघाला उपांत्य फेरीच्या सामन्यात इंग्लंडविरुद्ध दारुण पराभवाला सामोरे जावे लागले. यानंतर टीम इंडियावर सर्वत्र टीका होत आहे. रोहित शर्माच्या कर्णधारपदावर प्रश्न उपस्थित केले जात आहेत. इंग्लंडविरुद्धच्या दारूण पराभवानंतर क्रिकेटचा देव सचिन तेंडुलकरने (Sachin Tendulkar) पहिलं विधान केलं आहे. त्याने टीम इंडियासाठी (Team India) मोठी गोष्ट सांगितली आहे. भारताचा महान खेळाडू सचिन तेंडुलकर म्हणाला, 'तुम्ही फक्त एका सामन्याच्या आधारे भारतीय संघाच्या कामगिरीचा न्याय करू शकत नाही. आपन टी-20 क्रिकेटमधला नंबर वन संघ आहोत. हे एका रात्रीत घडत नाही. येथे पोहोचण्यासाठी दीर्घकाळ चांगले क्रिकेट खेळावे लागते. खेळाडूंनाही बाहेर जाऊन अपयशी व्हायचे नव्हते. खेळात चढ-उतार येतच राहतात. यामध्ये आपण एकत्र असायला हवे.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement