'Main Kya Karu? Job Chod Du?': रोहित शर्माच्या 'या' निर्णयावर अश्विनची धम्माल प्रतिक्रीया

सामना अनिर्णित राहिल्यानंतर अश्विनने पुजाराला गोलंदाजी देण्याच्या निर्णयावर विनोदी प्रतिक्रीया मीमद्वारे दिली.

भारत-ऑस्ट्रेलिया (IND VS AUS) चार कसोटी सामन्यांच्या मालिकेत चार सामन्यांत 25 बळी घेऊन रविचंद्रन अश्विन (Ravi Ashwin) सर्वाधिक विकेट घेणारा गोलंदाज ठरला. तर 22 विकेट घेणाऱ्या रवींद्र जडेजासोबत तो मालिकेतील सर्वोत्तम खेळाडूही ठरला आहे. चौथ्या कसोटीच्या अंतिम सत्रात स्टीव्ह स्मिथ आणि मार्नस लॅबुशेन यांची विकेट काढण्यासाठी कर्णधार रोहित शर्माने सर्व पर्यायाचा वापर करुन ही यश न आल्यानंतर चेंडू त्यांने चेतेश्वर पुजाराकडे (Cheteshwar Pujara) सोपावला. हा सामना अनिर्णित राहिल्यानंतर अश्विनने पुजाराला गोलंदाजी देण्याच्या निर्णयावर विनोदी प्रतिक्रीया मीमद्वारे दिली. मैं क्या करू? जॉब छोड दू  (Main kya karu? Job chod du) असे विनोदी मीम त्याने सोशल मिडीयावर पोस्ट केले.

पहा मीम -

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement