Jasprit Bumrah च्या इंस्टा स्टोरीची चर्चा; 'Silence is sometimes the best answer' नंतर Mumbai Indians ला देखील केलं अनफॉलो

काहींनी याचं कनेक्शन हार्दिक पांड्याच्या मुंबई इंडियंस मध्ये परत जाण्याशी देखील लावला आहे.

जसप्रीत बुमराह (Photo Credit: PTI)

ICC Cricket World Cup 2023 मध्ये ऑस्ट्रेलिया विरूद्ध भारत पराभूत झाल्यानंतर टीम इंडियामधील अनेक खेळाडूंनी पोस्ट शेअर करत आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. यामध्ये आता Jasprit Bumrah ची इंस्टा स्टोरी सध्या चर्चेमध्ये आहे. 'Silence is sometimes the best answer'म्हणजेच शांत राहणंच अनेकदा सर्वोत्तम उत्तर असतं हा कोट त्याने शेअर केला आहे. त्याने मुंबई इंडियंस टीमला देखील अनफॉलो केलं आहे. त्यामुळे आता त्याचं हे मुंबई इंडियंसला अनफ़ॉलो करणं आणि कोट्स यामुळे अनेक चर्चा सुरू झाल्या आहे. काहींनी याचं कनेक्शन हार्दिक पांड्याच्या मुंबई इंडियंस मध्ये परत जाण्याशी देखील लावला आहे.

पहा पोस्ट

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement