IND vs AUS, 2nd T20: भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया सामन्यात ओल्या आउटफिल्डमुळे टॉसला उशीर, अंपायर 8 नंतर घेतील निर्णय

दोन्ही संघांच्या कर्णधारांशी चर्चा केल्यानंतर 8 वाजता पुन्हा मैदानाची पाहणी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

Photo Credit - Twitter

नागपुरात भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील दुसऱ्या टी-20 सामन्यात ओल्या मैदानामुळे नाणेफेकीला उशीर झाला. 7 वाजल्यानंतर पंचांनी मैदानाची पाहणी केली आणि दोन्ही संघांच्या कर्णधारांशी चर्चा केल्यानंतर 8 वाजता पुन्हा मैदानाची पाहणी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या सामन्यात मोठे लक्ष्य ठेवूनही भारतीय संघाला पराभवाला सामोरे जावे लागले होते. तीन सामन्यांची मालिका जिवंत ठेवण्यासाठी भारतीय संघ शुक्रवारी दुसऱ्या T20 सामन्यात त्यांच्या उणीवा दूर करण्याचा प्रयत्न करेल, परंतु स्टार गोलंदाज जसप्रीत बुमराहबाबत अजूनही संभ्रम आहे.

Tweet

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement