IND vs BAN 2nd Test Day 3 Live Update: भारताला बसला तिसरा धक्का, पुजारानंतर शुभमन गिलही झाला बाद

टीम इंडियाला हा सामना जिंकण्यासाठी 145 धावांची गरज आहे. दुसऱ्या डावात फलंदाजीसाठी आलेल्या टीम इंडियाला तिसरा मोठा धक्का बसला.

शुभमन गिल (Photo Credit: PTI)

IND vs BAN 2nd Test: भारत आणि बांगलादेश यांच्यातील दुसरी आणि अंतिम कसोटी ढाका येथे खेळली जात आहे. आज सामन्याचा तिसरा दिवस आहे. या सामन्यात बांगलादेशने पहिल्या डावात 227 धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात भारताने 314 धावा केल्या. बांगलादेशचा संघ दुसऱ्या डावात 231 धावा करू शकला. बांगलादेशकडून लिटन दासने सर्वाधिक 73 धावा केल्या. टीम इंडियाकडून अक्षर पटेलने सर्वाधिक तीन विकेट घेतल्या. टीम इंडियाला हा सामना जिंकण्यासाठी 145 धावांची गरज आहे. दुसऱ्या डावात फलंदाजीसाठी आलेल्या टीम इंडियाला तिसरा मोठा धक्का बसला. पुजारानंतर गिल पण आऊट झाला आहे. टीम इंडियाचा स्कोर 32/3 आहे.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement