England Beat India: दुसऱ्या टी-20 सामन्यात इंग्लंडने टीम इंडियाचा 4 गडी राखून केला पराभव, मालिकेवर केला कब्जा
दोन्ही संघांमधील हा सामना मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर खेळला गेला. दुसऱ्या टी-20 सामन्यात इंग्लंडने टीम इंडियाचा चार विकेट राखून पराभव केला आणि मालिकेत 2-0 अशी अभेद्य आघाडी घेतली. या विजयासह इंग्लंडने टी-20 मालिकाही जिंकली.
भारतीय महिला क्रिकेट संघ आणि इंग्लंड (IND vs ENG) यांच्यातील तीन सामन्यांच्या टी-20 मालिकेतील दुसरा सामना आज खेळला गेला. दोन्ही संघांमधील हा सामना मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर खेळला गेला. दुसऱ्या टी-20 सामन्यात इंग्लंडने टीम इंडियाचा चार विकेट राखून पराभव केला आणि मालिकेत 2-0 अशी अभेद्य आघाडी घेतली. या विजयासह इंग्लंडने टी-20 मालिकाही जिंकली. तत्पूर्वी, इंग्लंडची कर्णधार हीदर नाइटने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. नाणेफेक हारून प्रथम फलंदाजीला आलेल्या टीम इंडियाचा डाव 16.2 षटकात केवळ 80 धावांवरच मर्यादित राहिला. टीम इंडियाकडून जेमिमाह रॉड्रिग्जने सर्वाधिक 30 धावा केल्या. इंग्लंडकडून शार्लोट डीन, लॉरेन बेल, सोफी एक्लेस्टोन आणि सारा ग्लेन यांनी प्रत्येकी दोन बळी घेतले. लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी उतरलेल्या इंग्लंड संघाने अवघ्या 11.2 षटकांत सहा गडी गमावून लक्ष्य गाठले. इंग्लंडकडून अॅलिस कॅप्सीने सर्वाधिक 25 धावांची खेळी खेळली. टीम इंडियाकडून रेणुका ठाकूर सिंग आणि दीप्ती शर्मा यांनी प्रत्येकी सर्वाधिक दोन विकेट घेतल्या. या मालिकेतील तिसरा आणि शेवटचा सामना उद्या म्हणजेच 10 डिसेंबर रोजी होणार आहे.