Maharashtra Political Crisis: एकनाथ शिंदे-राज ठाकरे यांची फोन वरून 2 वेळेस चर्चा; मनसे नेत्याचा दुजोरा

महाविकास आघाडी मधून 39 शिवसेना आमदार बंड करून बाहेर पडले आहेत. त्यामुळे सरकार फूटीच्या उंबरठ्यावर आहे.

Raj Thackeray | (Photo Credits: Facebook)

महाविकास आघाडी सरकार मधून बाहेर पडलेले अपक्ष आणि शिवसेना आमदारांचे बंड आता नव्या वळणावर आले आले. त्यांचा गट विलीन करायची वेळ आल्यास राजकीय पर्यायांची चाचपणी करताना त्यांच्याकडे मनसेचाही पर्याय आहे. सध्या मागील काही दिवसांत एकनाथ शिंदे-राज ठाकरे यांच्यात 2 वेळेस चर्चा झाली आहे. या चर्चेमध्ये एकनाथ शिंदेंनी राजकीय परिस्थिती आणि राज ठाकरेंच्या तब्येतीची विचारपूस केल्याचं सांगितलं जात आहे. मनसे नेत्याने या दोन नेत्यांच्या फोनवरील बातचितीच्या वृत्ताला दुजोरा दिल्याचे एएनआय चं वृत्त आहे.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now