Bengaluru Bandh: कावेरीचा पाणी प्रश्न पुन्हा पेटला, अनेक संघटनांनी दिली बंगळूरु बंदची हाक

न्यायालयाच्या निर्देशानंतर तामिळनाडूला पाणी सोडण्यास सरकारसह स्थानिक नागरिकांचा विरोध आहे. याच कारणामुळे न्यायालयाच्या निर्देशानंतर कर्नाटक पोलिसांनी बंगळुरूच्या त्या भागात सुरक्षा उपाय कडक केले आहेत

कावेरी नदीचे पाणी तामिळनाडूला सोडण्याच्या विरोधात कर्नाटकात आंदोलने तीव्र झाली आहेत. याच्या निषेधार्थ आज अनेक संघटनांनी बंद पुकारला आहे. बंदमुळे मॅजेस्टिक बसस्थानकावर प्रवाशांची संख्या कमी दिसून येत आहे. तथापि, बीएमटीसीने सांगितले की बेंगळुरू मेट्रोपॉलिटन ट्रान्सपोर्ट कॉर्पोरेशनचे सर्व मार्ग नेहमीप्रमाणे चालू राहतील. कावेरी पाण्याच्या प्रश्नावर बंदला ऑटोचालकांचाही पाठिंबा मिळाला आहे. (हेही वाचा - Home Loan: मोदी सरकारचा मोठा निर्णय! घर खरेदी करणाऱ्यांना मिळणार स्वस्तात गृहकर्ज, वाचा सविस्तर)

मात्र, सर्वोच्च न्यायालयाने तामिळनाडूला पाणी सोडण्याचे निर्देश दिले आहेत. मात्र न्यायालयाच्या निर्देशानंतर तामिळनाडूला पाणी सोडण्यास सरकारसह स्थानिक नागरिकांचा विरोध आहे. याच कारणामुळे न्यायालयाच्या निर्देशानंतर कर्नाटक पोलिसांनी बंगळुरूच्या त्या भागात सुरक्षा उपाय कडक केले आहेत, जिथे मोठ्या संख्येने तामिळ भाषिक लोक राहतात.

पाहा व्हिडिओ -

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement