Shiv Sena (UBT) BJP Alliance: उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत मिलींद नार्वेकर यांचा युतीवरुन सवाल; चंद्रकांत पाटील यांचे दिलखुलास उत्तर

उद्धव ठाकरे यांचा शिवसेना (UBT) आणि भाजप युती म्हणून पुन्हा एकत्र येणार? मिलींद नार्वेकर यांच्या प्रश्नाला मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिले उत्तर.

Milind Narvekar, Uddhav Thackeray, Chandrakant Patil | | (Photo Credits: Archived, edited, symbolic images)

उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांची शिवसेना (UBT) आणि भाजप यांची पुन्हा युती होणार का? असा राजकीय वर्तुळात पडद्याआडून विचारला अनेकांच्या मनातला प्रश्न थेट विधानसभा सदस्य मिलिंद नार्वेकर यांनीच विचारला आणि राजकीय गॉसीप रंगू लागले. निमित्त होते भाजपचे (BJP) विले पार्ले विधानसभा मतदारसंघाचे आमदार पराग अळवणी (Parag Alavani) यांच्या कन्येच्या विवाह सोहळ्याचे. सोहळ्यात उद्धव ठाकरे मिलींद नार्वेकर (Milind Narvkar) आणि चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) हे तिघे समोरासमोर आले. या वेळी नार्वेकर यांनी थेट सवाल विचारत गुगली टाकली. यावर चंद्रकांत पाटील यांनीही दिलखुलास उत्तर दिले. नेमके काय घडले? घ्या जाणून.

मग युती कधी?

..तर घडले असे, उद्धव ठाकरे, त्यांचे अतिशय विश्वासू मिलींद नार्वेकर आणि भाजप नेते मंत्री चंद्रकांत पाटील हे विवाहसोहळ्यात आमनेसामने आले. या वेळी नार्वेकर यांनी मग युती कधी? असा थेट सवाल करत गुगली टाकली. त्यावर चंद्रकांत पाटील यांनीही मग 'मी तर त्याच सुवर्ण क्षणांची वाट पाहतो आहे' असे म्हणत दिलखुलास उत्तर दिले. ज्यामुळे राजकीय वर्तुळात पुन्हा एकदा नव्या युतीची चर्चा सुरु झाली आहे. (हेही वाचा, BMC Election 2025: उद्धव ठाकरे मुंबईत स्वबळावर लढणार? शरद पवार यांनी दिला भेटीचा दाखला; वाचा सविस्तर)

ठाकरेंना सोबत घेण्याचा भाजपचा विचार?

शिवसेना भाजप युती तुटली त्याला अनेक वर्षे झाली. त्यानंतर शिवसेनासुद्धा फुटली आणि उद्धव ठाकरे यांची शिवसेना (UBT) आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची शिवसेना असे दोन पक्ष तयार झाले. त्यातही असे की, आता एकनाथ शिंदे यांचा शिवसेना आणि अजित पवार यांची राष्ट्रवादी भाजपसोबत गेल्याने महायुती सरकार सत्तेत आहे. असे असताना पुन्हा उद्धव ठाकरे यांना सोबत घेण्याचा विचार भाजप करेल का? किंवा भाजपसोबत जाण्याचा ठाकरे तरी विचार करतील का? असा प्रश्न आहे. मात्र, राजकारणामध्ये काहीही घडू शकतं. त्यामुळे या प्रश्नाचीही चर्चा कायम राहणार हे नक्की. (हेही वाचा, BMC Election 2025: उद्धव ठाकरेंची शिवसेना बीएमसी निवडणूक 2025 एकट्याने लढणार; Sanjay Raut यांची मोठी घोषणा)

ठाकरे-फडणवीस भेटीच्याही चर्चा

दरम्यान, राज्य हिवाळी अधिवेशनाच्या नागपूर अधिवेशनावेळी उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात भेट झाली. त्यानंतर आदित्य ठाकरे यांनीही देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. या भेटीचेही राजकीय अर्थ काढले गेले. इतकेच नव्हे तर, एकनाथ शिंदे यांच्यावर महायुती सरकारमध्ये दबाव कायम ठेवण्यासाठी भाजप उद्धव ठाकरे यांना सोबत घेणार का? असाही सवाल उपस्थित केला जाऊ लागला आहे. काही असले तरी, मिलींद नार्वेकर यांचा सवाल आणि चंद्रकांत पाटील यांचे उत्तर यामुळे राजकीय वर्तुळात मात्र चर्चेला नवा विषय मिळाला आहे.

(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)

Share Now

Share Now