Palghar Murder Case Reopened After 23 Years: जातोस कुठे? सुट्टी नाही! पालघर हत्या प्रकरात ऑटोरिक्षा चालक 21 वर्षांनी अटक
Thane Minor Murder Case: पालघरमधील 2001 मध्ये झालेल्या हत्येप्रकरणी महाराष्ट्र पोलिसांनी ऑटोरिक्षा चालक हारुण सय्यदला 23 वर्षांनंतर अटक केली. एका वेगळ्या प्रकरणात, ठाण्यात एका 15 वर्षीय मुलाला सहकाऱ्याच्या हत्येप्रकरणी ताब्यात घेण्यात आले आहे.
Cold Case Maharashtra: एका हत्या प्रकरणात दोन दशकांहून अधिक काळ अटक टाळत असलेला एक ऑटोचालक अखेर कायद्याच्या कचाट्यात अडकला आहे. महाराष्ट्रातील पालघर जिल्ह्यातील 2001 मधील एका खून (2001 Palghar Murder Case) प्रकरणात 43 वर्षीय ऑटोरिक्षा चालक हारुन अली मुस्तकीन अली सय्यद (Harun Sayyed ) यास पोलिसांनी अटक केली आहे. मीरा-भाईंदर वसई-विरार गुन्हे शाखेने केलेल्या अटकेमुळे 23 वर्षांपासून उलघडा न झालेल्या हत्या प्रकरणाचा उलघडा झाला आहे. तब्बल 21 वर्षांनी का होईना आरोपी गळाला लागल्याने कायद्याचे हात लांब असतात हे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे.
काय आहे प्रकरण?
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हे प्रकरण दोन दशकांपूर्वीचे म्हणजेच 14 ऑक्टोबर 2001 या दिवशी घडलेल्या घटनेबाबतचे आहे. प्रकरणाबाबत नेमकी माहिती अशी की, मोहरम अली (५६) हा प्रवासी सय्यदच्या ऑटोरिक्षात चढला होता. त्यांच्यात भाड्यावरून वाद झाला होता, त्यानंतर सय्यदने प्रवाशावर अचानक चाकूचे अनेक वेळा वार केले आणि घटनास्थळावरून पळून गेला. या प्रकारानंतर भयंकर जखमी आवस्थेत मोहरम अली हा प्रवासी रक्तबंबाळ अवस्थेत एका तासाच्या आत जखमी होऊन मरण पावला. (हेही वाचा, Life Imprisonment Thane: किराणा दुकानदार हत्या प्रकरणात दोघांना जन्मठेप; ठाणे कोर्टाचा निर्णय)
जुनी फाईल पुन्हा उघडली
पाच महिन्यांपूर्वीपर्यंत हा खटला थंडावला होता, परंतु वरिष्ठ निरीक्षक शाहुराज रणवरे आणि त्यांच्या टीमने तपास पुन्हा सुरू करण्याचा निर्णय घेतला. टीमने पारंपारिक गुप्तहेर काम आणि आधुनिक देखरेखीच्या तंत्रांचा वापर केला. त्यांनी जुन्या फायली पुन्हा तपासल्या, साक्षीदारांच्या मुलाखती घेतल्या आणि न्यायाची वाट पाहणाऱ्या पीडितेच्या कुटुंबीयांशी संपर्क साधला आणि आरोपीस अटक केली.
या प्रकरणाचा तपास करणाऱ्या पोलिसांनी पालघर, मुंबई आणि उत्तर प्रदेशातील सय्यदच्या मूळ गावीही प्रवास केला. स्थानिक माहिती देणाऱ्या आणि जमिनीवरील गुप्तचरांच्या मदतीने, आरोपीला अखेर पालघर जिल्ह्यातील तलासरी येथे शोधण्यात आले आणि सोमवारी त्याला अटक करण्यात आली. त्यानंतर त्याला विरार पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. पालघर पोलीस त्याच्यावर पुढील कारवाई करतील.
ठाणे येथे हत्या प्रकरणात अल्पवयीन मुलास अटक
दरम्यान, ठाणे जिल्ह्यातीलच आणखी एका वेगळ्या प्रकरणात पोलिसांनी भिवंडीतील सुरई गावात एका 15 वर्षीय मुलासा त्याच्या सहकाऱ्याच्या हत्येप्रकरणी ताब्यात घेण्यात आले. ही घटना बुधवारी दुपारी घडली. पीडित मुलगा आणि एका 22 वर्षीय पुरूष, दोघेही सुतार म्हणून काम करत होते, त्यांच्यात स्वयंपाक आणि भांडी धुण्यासारख्या घरकामांवरून जोरदार वाद झाला. नारपोली पोलिस स्टेशनचे वरिष्ठ निरीक्षक भरत कामत यांनी दिलेल्या माहितीनुसार, अल्पवयीन मुलाने कैसर अजगर अली या पुरूषावर प्लाय कटरने हल्ला केला, ज्यामुळे खांद्यापासून मानेपर्यंत गंभीर दुखापत झाली. त्यातच रक्तस्त्राव झाल्याने त्याचा मृत्यू जाला. कैसरला जवळच्या रुग्णालयात नेण्यात आले परंतु संध्याकाळी तो जखमी झाल्याने त्याचा मृत्यू झाला. भारतीय न्याय संहिता (BNS) च्या कलम 103(1) अंतर्गत या अल्पवयीन मुलावर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे आणि त्याला भिवंडी येथील रिमांड होममध्ये पाठवण्यात आले आहे. सध्या या प्रकरणाचा तपास सुरू आहे.
(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)