MSRTC Sleeper Buses: प्रवाशांना दिलासा! एसटी महामंडळ सुरू करणार 'स्लीपर बसेस'; जाणून घ्या कधी सुरु होणार योजना
या योजनेबद्दल एमएसआरटीसीच्या ऑपरेशन विभागाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, ते राज्यातील तालुके आणि गावे थेट आर्थिक राजधानीशी जोडण्याचा प्रयत्न करत आहेत. सध्या, लोकांना एकतर रेल्वे किंवा खाजगी ऑपरेटरद्वारे चालवल्या जाणार्या बसने प्रवास करावा लागतो.
महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ (MSRTC) खाजगी ऑपरेटर्सशी स्पर्धा करण्यासाठी आणि रेल्वे प्रवाशांना पर्याय उपलब्ध करून देण्यासाठी या आर्थिक वर्षाच्या अखेरीस म्हणजेच एप्रिल 2023 पर्यंत, 50 बिगर वातानुकूलित पूर्णपणे स्लीपर बसेस (Sleeper Bus) सुरु करण्याची योजना आखत आहे. यातील बहुतांश बसेस मुंबई-कोकण मार्गावर सुरू करण्यात येणार आहेत. बसेस एकूण खर्चाच्या कराराच्या आधारावर सुरू केल्या जातील, म्हणजे भाडे एमएसआरटीसी प्राधिकरणाद्वारे वसूल केले जाईल. कंत्राटदार चालकांना सेवा पुरवेल व प्राधिकरण कंत्राटदारांना सेवा देण्यासाठी ठराविक रक्कम देईल.
प्रवाशांची संख्या आणि नोकरदार वर्गातील लोकांची सोय लक्षात घेऊन यापैकी बहुतांश बसेस संध्याकाळी सुटतील, असे एमएसआरटीसीच्या अधिकाऱ्याने सांगितले. सध्या, महामंडळामार्फत राज्यभरात सुमारे 150 नॉन-एसी सीटर/स्लीपर बसेस, ज्यांना सेमी-स्लीपर बस म्हणूनही ओळखले जाते, चालविल्या जात आहेत. या सेमी-स्लीपर बसमध्ये 30 पुशबॅक सीट आणि 15 स्लीपर बर्थ आहेत. नवीन बसेसमध्ये सर्वच्या सर्व 40 स्लीपर बर्थ असतील.
या बसेसमध्ये रीडिंग लॅम्प, नाईट लॅम्प, चार्जिंग पॉइंट, पंखे आणि दोन मोठे स्टोरेज कंपार्टमेंट यासारख्या सुविधा असतील. बसेसमध्ये अग्निसुरक्षा उपाय देखील आहेत. पुढील 45 दिवसांत एक प्रोटोटाइप बस तयार होण्याची शक्यता आहे. एका अधिकाऱ्याने सांगितले की, या बसेस रात्रीच्या वेळी वाहतुकीच्या समस्येचे निराकरण करण्यासाठी (सामान्यत: रात्रीच्या रहदारीचे प्रमाण कमी असते) तसेच प्रवाशांच्या सोयीसाठी सुरू करण्याचा विचार करत आहोत. नोकरदार वर्गातील लोकांची सोय लक्षात घेऊन या गाड्यांचे वेळापत्रक तयार केले जाणार आहे. (हेही वाचा: लवकरच बंद होणार ठाणे आणि बोरिवलीहून पुण्याला जाणाऱ्या शिवनेरी बसेस; जाणून घ्या काय आहे MSRTC ची नवी योजना)
या योजनेबद्दल एमएसआरटीसीच्या ऑपरेशन विभागाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, ते राज्यातील तालुके आणि गावे थेट आर्थिक राजधानीशी जोडण्याचा प्रयत्न करत आहेत. सध्या, लोकांना एकतर रेल्वे किंवा खाजगी ऑपरेटरद्वारे चालवल्या जाणार्या बसने प्रवास करावा लागतो. हे पर्याय थेट गावांशी जोडले जात नाहीत. मात्र आता एसटी महामंडळ लोकांच्या याच समस्येचे निराकरण करणार आहे. MSRTC सध्या राज्यभरात सुमारे 16,500 बसेस चालवते. ही सेवा दररोज सुमारे 70 लाख प्रवाशांची सेवा करते.
(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)