MNS Jagar Yatra: मुंबई-गोवा महामार्गाच्या दुरावस्थेकडे लक्ष वेधण्यासाठी मनसेची जागर यात्रा सुरू

एकूण 16 किमीच्या या पदयात्रेमध्ये अमित ठाकरे, बाळा नांदगावकर, राजू पाटील, संदीप देशपांडे या यात्रेमध्ये विविध टप्प्यात चालणार आहेत.

Amit Thackeray MNS Jagar Yatra | Twitter

मनसेच्या जागर यात्रेला (MNS Jagar Yatra) आज पहाटेपासून सुरूवात झाली आहे. मनसेचे युवा नेते अमित ठाकरे (Amit Thackeray) यांच्या नेतृत्त्वाखाली या जागर यात्रेला सुरूवात झाली आहे. पळस्पे पासून त्यांनी पदयात्रा सुरू केली आहे. मागील 17 वर्षांपासून रखडलेला मुंबई-गोवा महामार्ग, निकृष्ट दर्जाचे झालेलं काम याकडे लक्ष वेधण्यासाठी मनसेने ही जागर यात्रा सुरू केली आहे. मनसेचे 8 विविध नेते वेगवेगळ्या टप्प्यावर चालणार आहेत.तर या पदयात्रेचा समारोप मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या उपस्थितीत होणार आहेत.

एकूण 16 किमीच्या या पदयात्रेमध्ये अमित ठाकरे, बाळा नांदगावकर, राजू पाटील, संदीप देशपांडे या यात्रेमध्ये विविध टप्प्यात चालणार आहेत. मुंबई-गोवा महामार्गावर विविध अपघातांमध्ये आतापर्यंत अडीज हजारांपेक्षा अधिक लोकांनी जीव गमावला आहे.

या यात्रेचा पहिला टप्पा हा पळस्पे ते माणगाव निघणार आहे. तर या यात्रेचा दुसरा टप्पा हा भरणी नाका ते राजापूर असणार आहे. तिसऱ्या टप्प्यात राजापूर ते बांदापर्यंत गाव जनजागृती अभियान राबवण्यात येणार असल्याची माहिती मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी दिली आहे. Mumbai- Goa Highway: गणेशोत्सव होईपर्यंत मुंबई-गोवा महामार्गावर अवजड वाहनांना बंदी .

दरम्यान काल सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी कामाची पाहणी केली आहे. हे काम लवकरच होणार असल्याचं आश्वासन त्यांनी दिलं आहे. या महामार्गावरील एका लेनचं काम गणेशोत्सवापूर्वी होणार आहे. तर दुसऱ्या लेनच काम डिसेंबरपर्यंत होणार असल्याची माहिती त्यांनी दिली आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement