Maharashtra BJP तर्फे मुंबईत आदिवासी मुलांला 25 स्मार्टफोनचे वाटप;  Online Classes पासून वंचित राहणाऱ्या विद्यार्थ्यांना मिळाली मदत

स्मार्टफोन (Smartphones) नसल्यामुळे मुंबई (Mumbai) तील आरे कॉलनीतील (Aarey Colony) खंबाचा पाडा (Khambacha Pada) पाडा येथील काही आदिवासी विद्यार्थी (Tribal Children) ऑनलाईन शिक्षणापासून (Online Education) वंचित राहिले होते.

Maharashtra BJP Distributes 25 Smartphones to Tribal Kids. (Photo Credits: Twitter)

स्मार्टफोन (Smartphones) नसल्यामुळे मुंबई (Mumbai) तील आरे कॉलनीतील (Aarey Colony) खंबाचा पाडा (Khambacha Pada) पाडा येथील काही आदिवासी विद्यार्थी (Tribal Children) ऑनलाईन शिक्षणापासून (Online Education) वंचित राहिले होते. ही गंभीर बाब लक्षात घेऊन सामाजिकदृष्ट्या जागरूक असलेल्या भाजपा उत्तर भारतीय मोर्चा (BJP North Indian Front) विद्यार्थ्यांना मदत करण्यासाठी पुढे आले आहेत. रविवारी 30 ऑगस्ट रोजी भाजपा उत्तर भारतीय मोर्चाने मुंबई च्या खंबाचा पाडा येथील 25 आदिवासी विद्यार्थ्यांना 25 स्मार्टफोन दिले. स्मार्टफोनच्या वितरणाची माहिती भाजपा उत्तर भारतीय आघाडीचे अध्यक्ष संजय पांडे यांनी दिली.

संजय पांडे म्हणाले की, ‘कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव झाल्यामुळे सध्या शाळा बंद असून, विद्यार्थ्यांची सुरक्षितता सुनिश्चित करण्यासाठी तसेच त्यांच्या शिक्षणास हानी पोहोचवू नये यासाठी ऑनलाइन वर्ग सुरू करण्यात आले आहेत. परंतु त्याच वेळी बर्‍याच लोकांच्या नोकर्‍या गेल्या आहेत, त्यामुळे कमी उत्पन्न असलेल्या लोकांना घर चालवणे अवघड आहे. अशा परिस्थितीत बर्‍याच गरीब गरजू विद्यार्थ्यांना मोबाइल फोन विकत घेणे शक्य नाही. घरी स्मार्टफोन उपलब्ध नाहीत, यामुळे अनेक विद्यार्थी अजूनही शिक्षणापासून वंचित आहेत.’

पांडे पुढे म्हणाले, ‘आरे कॉलनी, मुंबईतील खंभा पाड़ा येथे राहणाऱ्या आदिवासी मुलांची ही दुर्दशा होती. त्यांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यास मदत करणे आवश्यक होते, म्हणूनच 25 आदिवासी विद्यार्थ्यांना स्मार्ट फोन डीएल गेले. हे पाहून त्यांच्या आणि त्यांच्या कालाकांच्या चेहऱ्यावर जो आनंद दिसला त्याने आम्हाला खूप आनंद दिला.’ (हेही वाचा: सर्व विद्यार्थ्यांना शिक्षण उपलब्ध करुन देण्यासाठी महाराष्ट्र शासनासोबत Google ची भागीदारी; गुगल क्लासरुम सुरु करणारे Maharashtra ठरले देशातील पहिले राज्य)

दरम्यान, मुंबईत 1 वर्षानंतर बीएमसी (BMC)) निवडणुका होणार आहेत, अशा परिस्थितीत भाजप, शिवसेनेसह राष्ट्रवादी आणि कॉंग्रेसची व्होट बँक तोडण्याचा प्रयत्न करीत आहे. भाजपा महाविकास आघाडीविरोधात संपूर्ण निवडणूक लढवणार आहे. त्या दृष्टीने त्यांनी आदिवासी व मागासवर्गीयांना लक्ष्य करणे सुरू केले आहे जिथे ते कोरोना वेळेत मदत करू शकतील आणि त्यांच्या सहानुभूतीद्वारे महानगर पालिका निवडणुकीची तयारी करतील.

(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)

Share Now

Share Now