Jalgaon: जळगाव जिल्ह्यातील अमळनेरमध्ये क्षुल्लक कारणावरून दोन गटात हाणामारी; संचारबंदी लागू, 31 जणांना अटक

या घटनेनंतर आतापर्यंत 31 जणांना अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी 80 हून अधिक गुन्हे दाखल केले आहेत. चकमकीच्या ठिकाणी पोलीस बंदोबस्तही वाढवण्यात आला आहे. हाणामारी कोणी केली हे शोधण्यासाठी पोलिसांकडून सीसीटीव्ही फुटेजवर लक्ष ठेवले जात आहे.

Representative Image (File Image)

Jalgaon: महाराष्ट्रातील जळगाव जिल्ह्यातील अमळनेर (Amalner)येथे क्षुल्लक कारणावरून दोन गटांमध्ये हाणामारी झाल्यानंतर 48 तासांचा कर्फ्यू लागू (Curfew Imposed) करण्यात आला आहे. दोन गट एकमेकांना भिडल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिस चकमकीच्या ठिकाणी दाखल झाले. शुक्रवारी रात्री 10 वाजण्याच्या सुमारास हाणामारी झाल्याचे सांगण्यात येत आहे. वृत्तानुसार, मुलांच्या खेळण्यांवरून झालेल्या जोरदार वादाचे रूपांतर हाणामारीत झाले आणि दोन गटांनी एकमेकांवर दगड आणि विटांचा मारा केला.

या घटनेनंतर आतापर्यंत 31 जणांना अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी 80 हून अधिक गुन्हे दाखल केले आहेत. चकमकीच्या ठिकाणी पोलीस बंदोबस्तही वाढवण्यात आला आहे. हाणामारी कोणी केली हे शोधण्यासाठी पोलिसांकडून सीसीटीव्ही फुटेजवर लक्ष ठेवले जात आहे. (हेही वाचा - Kolhapur Riot: कोल्हापूर दंगल प्रकरणी 36 जणांना अटक; सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान, बेकायदेशीर जमाव जमविण्याचा आरोप)

कोल्हापूर दंगलीवरून वाद सुरू असतानाच या संघर्षाच्या बातम्या येत आहेत. कोल्हापुरात बुधवारी छत्रपती शिवाजी चौकात उजव्या विचारसरणीच्या संघटनांनी एकत्र येऊन औरंगजेब आणि टिपू सुलतानच्या फोटोंसह आक्षेपार्ह संदेश सोशल मीडियावर स्टेटस म्हणून ठेवला होता.

यावरून शहरात तणाव निर्माण करण्याच्या हेतूने समाजकंटकांकडून दगडफेक करण्यात आली. या घटनेनंतर परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून कोल्हापुरात इंटरनेट सेवा बंद ठेवावी लागली.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement