Shri Krishna Quotes From Bhagavad Gita: श्रीकृष्ण जन्माष्टमीनिमित्त WhatsApp Status, Facebook Messages द्वारे शेअर करा श्रीकृष्णाने अर्जुनाला दिलेले भगवत गीतेतील उपदेश
कुरुक्षेत्रमध्ये लढल्या गेलेल्या युद्धात भगवान श्रीकृष्णाने अजुर्नाला काही उपदेश दिले होते. श्रीकृष्णाने दिलेले हे उपदेश आजही तरुण पिढीसाठी प्रेरणा देणारे ठरत आहेत. श्रीकृष्ण जन्माष्टमीनिमित्त तुम्ही आपल्या मित्र-परिवारास भगवद् गीतेत श्रीकृष्णाने अर्जुनाला दिलेले खास सुविचार, उपदेश, प्रेरणादायी विचार शेअर करून गोकुळाष्टमीचा सण साजरा करू शकता.

Shri Krishna Quotes From Bhagavad Gita: सोमवारी देशभरात कृष्ण जन्माष्टमी (Krishna Janmashtami 2024) चा सण साजरा होणार आहे. यासाठी सर्वत्र तयारी सुरू आहे. बाळ गोपालाच्या मंदिरांची सुंदर फुलांनी सजावट सुरू आहे. श्रीकृष्णाचा जन्म भाद्रपद महिन्यात झाला होता. त्यामुळे यंदा सोमवारी म्हणेच 26 ऑगस्ट रोजी देशभरात भगवान श्रीकृष्णाचा जन्मोत्सव साजरा होणार आहे. (हेही वाचा - Bhagwan Krishna HD Images: श्रीकृष्ण जन्माष्टमीनिमित्त Whatsapp Status ला ठेवा गोपाळ कृष्णाचे 'हे' खास एचडी फोटोज)
कुरुक्षेत्रमध्ये लढल्या गेलेल्या युद्धात भगवान श्रीकृष्णाने अजुर्नाला काही उपदेश दिले होते. श्रीकृष्णाने दिलेले हे उपदेश आजही तरुण पिढीसाठी प्रेरणा देणारे ठरत आहेत. श्रीकृष्ण जन्माष्टमीनिमित्त तुम्ही आपल्या मित्र-परिवारास भगवद् गीतेत श्रीकृष्णाने अर्जुनाला दिलेले खास सुविचार, उपदेश, प्रेरणादायी विचार शेअर करून गोकुळाष्टमीचा सण साजरा करू शकता. (हेही वाचा - Janmashtami 2024 Quotes In Marathi: श्रीकृष्णजन्माष्टमी निमित्त WhatsApp Status, Facebook Messages, Greetings, Wallpapers द्वारा शेअर करा कृष्ण मुरारीचे प्रेरणादायी कोट्स)
भगवद् गीतामधील श्रीकृष्ण उपदेश, प्रेरणादायी कोट्स, सुविचार -
- मनाच्या शांती शिवाय या जीवनात कोणतीच मोठी संपत्ती नाही.
- कोणताही माणूस जन्माने नाही तर त्याच्या कर्माने महान होतो.
- फळाची इच्छा न ठेवता काम करणे हेत खरे कर्म आणि ईश्वर चरणी समर्पित तोच खरा धर्म
- जेव्हा माणसाच्या गरजा बदलतात तेव्हा माणसाची बोलण्याची पद्धत बदलते.
शांत राहण्यापेक्षा दुसरं कोणतंच मोठं उत्तर नाही आणि माफ करण्यापेक्षा दुसरी कोणती शिक्षा नाही.
- सतत संशय घेणारा माणूस या जगात नाही तर कुठेच आनंदी असू शकत नाही.
- जर मनाला नियंत्रित केलं नाही तर ते शत्रूसमान काम करेल.
- कोणीच आपल्या कर्मापासून पळून जाऊ शकत नाही, कारण कर्माचे फळ तर भोगावेच लागते.
- माफ करणं आणि शांत राहणं शिकाल तर तुमच्यात अशी ताकद येईल की डोंगर स्वतः तुम्हाला रस्ता बनवून देतील.
- अती आनंदी असताना आणि अती दुःखी असताना कधीच निर्णय घेऊ नका. कारण या दोन्ही परिस्थितीत तुम्ही योग्य निर्णय नाही घेऊ शकत.
- सत्य कधीच असं सांगत नाही की मी सत्य आहे, पण खोटं नेहमी ओरडून सांगतं की मीच सत्य आहे.
- तुझं, माझं, छोटं, मोठं असे भेद मनातून काढून टाका, मग सगळं तुमचं आहे आणि तुम्ही सर्वांचे आहात.
- जेव्हा तुम्ही ईश्वरावर खरे प्रेम करता तेव्हा तुम्ही कोणत्याही गोष्टीवर बिना संशय प्रेम करू लागता.
- स्वतःच्या आयुष्यात आहे तसे प्रामाणिकपणे जगणे हे दुसऱ्यांची नक्कल करत जगण्यापेक्षा लाखमोलाचे आहे.
- जीवनात कोणतीच गोष्ट स्थिर नाही, सगळीकडे बदल सुरू आहे, प्रत्येक गोष्ट वाढत आहे. हीच गोष्ट तुम्हाला जमिनीला धरून ठेवते.
श्रीमद भागवतात श्रीकृष्णाने अर्जुनला उपदेश देताना सांगितले की, आपण आपल्या समस्यांसाठी जगाला दोष देऊ नये. यासाठी सर्वप्रथम आपले विचार बदलणे अत्यंत आवश्यक आहे, आपले विचार बदलून आपण अनेक दुःखांचा अंत करू शकतो. आपण नेहमी एकमेकांना आधार दिला पाहिजे. शरीर नश्वर आहे पण आत्मा अमर आहे. ही वस्तुस्थिती कळल्यानंतरही माणसाला आपल्या नश्वर शरीराचा अभिमान वाटतो जो निरुपयोगी आहे. शरीराचा अभिमान न बाळगता माणसाने सत्याचा स्वीकार करावा, असंही कृष्णाने आपल्या उपदेशात म्हटलं होतं.
(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)