Shocking! परीक्षेत कमी गुण दिल्याच्या रागातून विद्यार्थ्यांनी शिक्षकांना झाडाला बांधून केली मारहाण

मिळालेल्या माहितीनुसार, नववीच्या प्रात्यक्षिक परीक्षेला एकूण 36 विद्यार्थी बसले होते. त्यापैकी 11 विद्यार्थी अनुत्तीर्ण झाले. यावर विद्यार्थ्यांनी शाळेतील गणित शिक्षक आणि 2 कर्मचाऱ्यांना पकडून झाडाला बांधून बेदम मारहाण केली.

विद्यार्थ्यांची शिक्षकांना मारहाण (Photo Credit : ANI)

झारखंडमधील (Jharkhand) दुमका येथील शाळेतून एक विचित्र प्रकरण समोर आले आहे. येथे काही विद्यार्थ्यांनी शिक्षकांना झाडाला बांधून मारहाण केली. शिक्षकांनी जाणूनबुजून प्रात्यक्षिकात कमी गुण दिल्याचा आरोप विद्यार्थ्यांनी केला आहे, त्यामुळे विद्यार्थी त्यांची परीक्षा देऊ शकले नाही. ही घटना उघडकीस येताच शिक्षण विभागात एकच खळबळ उडाली आहे. गडबडीत वरिष्ठ जिल्हा अधिकाऱ्यांनी घटनास्थळी पोहोचून विद्यार्थ्यांना समजावून सांगितले.

याबाबत ब्लॉक शिक्षण विस्तार अधिकारी सुरेंद्र हेब्रम म्हणाले, ‘आम्हाला घटनेची माहिती मिळाली. यानंतर आम्ही घटनास्थळी पोहोचलो आणि विद्यार्थी आणि शिक्षकांशी बोललो. विद्यार्थ्यांना प्रात्यक्षिकात खूप कमी गुण देण्यात आल्याचे विद्यार्थ्यांनी सांगितले. एवढेच नव्हे तर त्यांना शिक्षकांकडून योग्य तो प्रतिसादही मिळाला नाही.’

याप्रकरणी पीडित शिक्षक कुमार सुमन यांनी सांगितले की, विद्यार्थ्यांनी त्यांना मीटिंगच्या बहाण्याने बोलावले होते. विद्यार्थ्यांनी आपला निकाल खराब लागल्याने त्यांच्याशी बोलायचे होते, असे सांगितले. शिक्षक पोहोचल्यावर संतप्त विद्यार्थ्यांनी शिक्षक कुमार सुमन, शाळेचे मुख्य लिपिक सुनीराम चाडे आणि अचिंतो कुमार मल्लिक यांना आंब्याच्या झाडाला बांधून बेदम मारहाण केली.

मिळालेल्या माहितीनुसार, नववीच्या प्रात्यक्षिक परीक्षेला एकूण 36 विद्यार्थी बसले होते. त्यापैकी 11 विद्यार्थी अनुत्तीर्ण झाले. यावर विद्यार्थ्यांनी शाळेतील गणित शिक्षक आणि 2 कर्मचाऱ्यांना पकडून झाडाला बांधून बेदम मारहाण केली. त्यामुळे शिक्षक कुमार सुमन हे जखमी झाले आहेत. या संपूर्ण घटनेचे विद्यार्थ्यांनी फेसबुक लाईव्हही केले आहे. व्हिडिओ समोर आल्यानंतर डीडीसीने या प्रकरणाची चौकशी करून दोषींवर कारवाई करण्यास सांगितले आहे. (हेही वाचा: पत्नीने पतीला कार्यालयात भेटणे, सहकाऱ्यांसमोर शिवीगाळ करणे म्हणजे क्रूरता; छत्तीसगड उच्च न्यायालयाचा निर्णय)

दुसरीकडे, कोडरमा जिल्ह्यातील जयनगर ब्लॉक मुख्यालयात असलेल्या शाळेत दोन तरुणांनी रिव्हॉल्व्हर चालवल्याची घटना घडली. त्यानंतर विद्यार्थी आणि शिक्षकांमध्ये घबराट पसरली आहे. शासकीयकृत प्लस टू हायस्कूलमध्ये दुपारी एक वाजता दोन अनोळखी तरुण रिव्हॉल्व्हर घेऊन शाळेत पोहोचले आणि त्यांनी इयत्ता 11वीच्या पुढे हवेत पिस्तुल उडवण्यास सुरुवात केली. प्रभारी मुख्याध्यापक वरुण कुमार सिंह यांनी दोन्ही तरुणांना रिव्हॉल्व्हर चालवताना पाहिले आणि त्यांची चौकशी केली असता ते तेथून पळून गेले.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement