PM Kisan Samman Nidhi Yojana: जाणून घ्या शेतकऱ्यांसाठी आर्थिक आधार असलेल्या पीएम किसान सन्मान निधी योजनेचा 20 वा हप्ता कधी येणार; कसे तपासावे स्टेटस्
पीएम किसान योजनेचा प्राथमिक उद्देश शेतकऱ्यांना कृषी आणि संलग्न कामांसाठी आवश्यक असलेल्या खर्चासाठी आर्थिक सहाय्य प्रदान करणे हा आहे. यामुळे शेतकरी साहूकारांच्या जाचातून मुक्त होऊ शकतात आणि पिकांच्या योग्य आरोग्यासाठी बियाणे, खते आणि इतर साधनांची खरेदी करू शकतात. शेतकऱ्यांना या रकमेचा वापर कृषी खर्च, घरगुती गरजा किंवा इतर आवश्यकतेसाठी मोकळेपणाने करता येतो.
प्रधानमंत्री किसान सन्मान निधी (PM-KISAN) योजना ही भारत सरकारची एक महत्त्वाकांक्षी केंद्रीय योजना आहे, जी शेतकऱ्यांच्या आर्थिक स्थैर्यासाठी आणि कृषी क्षेत्राच्या विकासासाठी 1 डिसेंबर 2018 रोजी सुरू करण्यात आली. या योजनेअंतर्गत पात्र शेतकरी कुटुंबांना दरवर्षी 6,000 रुपये आर्थिक मदत दिली जाते, जी प्रत्येक चार महिन्यांनी 2,000 रुपयांच्या तीन समान हप्त्यांमध्ये थेट त्यांच्या आधार-लिंक केलेल्या बँक खात्यांमध्ये जमा केली जाते. याआधी 24 फेब्रुवारी 2025 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बिहारमधील भागलपूर येथे या योजनेचा 19 वा हप्ता जारी केला, ज्यामध्ये 9.8 कोटींहून अधिक शेतकऱ्यांना 22,000 कोटी रुपयांपेक्षा जास्त रक्कम देण्यात आली. आता शेतकरी 20 व्या हप्त्याची आतुरतेने वाट पाहत आहेत.
पीएम किसान योजनेच्या वेळापत्रकानुसार, दर चार महिन्यांच्या अंतराने हप्ते जारी केले जातात. 19 वा हप्ता फेब्रुवारी 2025 मध्ये रिलीज झाला होता, त्यामुळे 20 वा हप्ता जून किंवा जुलै 2025 मध्ये येण्याची शक्यता आहे. मात्र, अधिकृत तारीख अद्याप जाहीर झालेली नाही. शेतकरी नियमितपणे पीएम किसानची अधिकृत वेबसाइट (pmkisan.gov.in) तपासू शकतात आणि अपडेट्स जाणून घेऊ शकतात.
शेतकरी पीएम किसान पोर्टलद्वारे घरबसल्या त्यांच्या हप्त्याची स्थिती तपासू शकतात-
- पीएम किसानची अधिकृत वेबसाइट pmkisan.gov.in ला भेट द्या.
- होमपेजवरील 'फार्मर्स कॉर्नर' विभागात 'तुमची स्थिती जाणून घ्या' हा पर्याय निवडा. तुमचा नोंदणी क्रमांक, आधार क्रमांक किंवा मोबाईल क्रमांक प्रविष्ट करा.
- कॅप्चा कोड आणि ओटीपी टाका आणि सबमिट करा.
- यानंतर तुमचे स्टेटस स्क्रीनवर दिसेल. (हेही वाचा: Maharashtra Water Crisis: महाराष्ट्र करत आहे गंभीर पाणी संकटाचा सामना; मार्चपासून 32 धरणांमधील पाणीसाठ्यात 18% घट)
पीएम किसान योजनेचा प्राथमिक उद्देश शेतकऱ्यांना कृषी आणि संलग्न कामांसाठी आवश्यक असलेल्या खर्चासाठी आर्थिक सहाय्य प्रदान करणे हा आहे. यामुळे शेतकरी साहूकारांच्या जाचातून मुक्त होऊ शकतात आणि पिकांच्या योग्य आरोग्यासाठी बियाणे, खते आणि इतर साधनांची खरेदी करू शकतात. शेतकऱ्यांना या रकमेचा वापर कृषी खर्च, घरगुती गरजा किंवा इतर आवश्यकतेसाठी मोकळेपणाने करता येतो. सुरुवातीला 2 हेक्टरपर्यंत जमीन असलेल्या शेतकऱ्यांसाठी मर्यादित असलेली ही योजना 2019 पासून सर्व भूमिधारक शेतकऱ्यांसाठी खुली करण्यात आली.
(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)