Amit Shah's Manipur Meeting: हिंसाचार घडवून आणणाऱ्यांविरुद्ध होणार कायदेशीर कारवाई; Meitei आणि Kuki दोन्ही गटांशी केली जाणार बोलणी, अमित शाह यांनी मणिपूरबाबत घेतली उच्चस्तरीय बैठक
केंद्रीय गृहमंत्री म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील भारत सरकार मणिपूरच्या लोकांची सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी पूर्णपणे कटिबद्ध आहे. अमित शहा यांनी मदत शिबिरांच्या स्थितीचा आढावा घेतला, विशेषत: अन्न, पाणी, औषधे आणि इतर मूलभूत सुविधांच्या योग्य उपलब्धतेबाबत त्यांनी निर्देश दिले.
Amit Shah's Manipur Meeting: ईशान्य भारतातील मणिपूर (Manipur) राज्यात अनेक दिवसांपासून सुरू असलेला हिंसाचार अद्याप थांबलेला नाही. मात्र, केंद्र सरकार आता या मुद्द्यावर ॲक्शन मोडमध्ये आले आहे. मणिपूरमधील परिस्थितीबाबत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा (Amit Shah) यांनी सोमवारी गृह मंत्रालयात महत्त्वपूर्ण बैठक घेतली. याआधी गृहमंत्र्यांनी काल मणिपूरच्या राज्यपालांचीही भेट घेतली होती. केंद्रीय गृहमंत्री आणि सहकार मंत्री अमित शहा यांच्या अध्यक्षतेखाली आज नवी दिल्लीत मणिपूरमधील सुरक्षा परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी उच्चस्तरीय बैठक झाली.
यावेळी अमित शहा यांनी मणिपूरमधील एकूण सुरक्षा परिस्थितीचा आढावा घेतला आणि मणिपूरमध्ये यापुढे हिंसाचाराच्या घटना घडू नयेत असे निर्देश दिले. गृहमंत्र्यांनी राज्यात शांतता आणि एकोपा पुनर्संचयित करण्यासाठी केंद्रीय सैन्याच्या धोरणात्मक तैनातीची सूचना केली आणि आवश्यक असल्यास केंद्रीय दलांची तैनाती वाढविली जाईल, असेही सांगितले. हिंसाचार करणाऱ्यांवर कायद्यानुसार कठोर कारवाई करण्याचे निर्देशही गृहमंत्र्यांनी दिले.
केंद्रीय गृहमंत्री म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील भारत सरकार मणिपूरच्या लोकांची सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी पूर्णपणे कटिबद्ध आहे. अमित शहा यांनी मदत शिबिरांच्या स्थितीचा आढावा घेतला, विशेषत: अन्न, पाणी, औषधे आणि इतर मूलभूत सुविधांच्या योग्य उपलब्धतेबाबत त्यांनी निर्देश दिले. विस्थापित लोकांसाठी योग्य आरोग्य आणि शिक्षण सुविधा आणि त्यांचे पुनर्वसन सुनिश्चित करण्याचे निर्देश गृहमंत्र्यांनी मणिपूरच्या मुख्य सचिवांना दिले. (हेही वाचा: Amul Ice Cream: ग्राहकांना उच्च दर्जाच्या उत्पादनांची हमी देण्याची अमूलची ग्वाही, तक्रारीनंतर चौकशीसाठी नोएडा रहिवाशांकडून आइस्क्रीम टब मागवला)
सध्या सुरू असलेल्या वांशिक संघर्षाचे निराकरण करण्यासाठी समन्वित दृष्टिकोनाच्या महत्त्वावर गृहमंत्र्यांनी भर दिला. ते म्हणाले की गृह मंत्रालय लवकरात लवकर मेईतेई आणि कुकी या दोन्ही गटांशी बोलेल, जेणेकरून दोन्ही समुदायांमधील दरी कमी करता येईल. राज्यातील सुरक्षा परिस्थिती मजबूत करण्यासाठी भारत सरकार मणिपूर सरकारला सक्रियपणे पाठिंबा देत आहे.
(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)