मध्य प्रदेश: मंडला जिल्ह्यातील बाम्हनी भागात आज पहाटे बसचे नियंत्रण सुटल्यामुळे अपघात घडला. यामध्ये एकाचा मृत्यू आणि 12 जण जखमी झाले आहे. एएसपी गजेंद्रसिंग कंवर यांनी सांगितले की, जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
स्पुटनिक व्ही लस ची चाचणी भारतात तिस-या टप्प्यात आली असून मार्चच्या मध्यापर्यंत ही प्रक्रिया पूर्ण होईल अशी माहिती एफएस हर्षवर्धन श्रृंगला यांनी दिली आहे.
अमरावती, यवतमाळ आणि अकोला येथील अधिक कोरोना रुग्ण असलेले भाग containment zone म्हणून जाहीर करण्याचे निर्देश राज्याचे मुख्य सचिव संजय कुमार यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहेत.
एका इमारतीत 5 हून अधिक कोरोना रुग्ण आढळल्यास इमारत सील करण्यात येईल, असे BMC आयुक्त इकबाल सिंह चहल यांनी सांगितले. त्याचबरोबर लग्नसोहळ्याचे हॉल, क्लब आणि रेस्टोरन्ट्स यांच्यावर वेळोवेळी धाड टाकून तिथे नियमांचे उल्लंघन होत नाही, हे तपासले जाईल. ब्राझीलहून परतणाऱ्या प्रवाशांना इंस्टीट्युशनल क्वारंटाईन होणे गरजेचे आहे. अधिक रुग्ण आढळणाऱ्या भागात चाचण्यांचे प्रमाण वाढवण्यात येईल.
उत्तराखंड दुर्घटना: 61 मृतदेह आणि 28 शरीराचे अवयव बाहेर काढण्यात आले. 34 मृतदेह आणि 1 शरीराचा भाग यांची ओळख पटली असून 56 कुटुंबातील सदस्य आणि 49 मृतदेहाचे डीएनए नमुने घेण्यात आले आहेत, अशी माहिती चामोली पोलिसांनी दिली आहे.
कोरोना व्हायरस संसर्गाचा वाढता प्रादूर्भाव रोखण्यासाठी मुंबई महापालिका सतर्क झाली आहे. त्यामुळे क्वारंटाईन असणाऱ्या नागरिकांना अधिक काळजी घ्यावी लागणार आहे. क्वारंटाईन असलेली व्यक्ती जर बाहेर फिरताना आढळली तर त्या व्यक्तीवर थेट एफआयआर केला जाणार आहे.
आता देशभरात जाऊन 40 लाख ट्रॅक्टर्स एकत्र आणले जातील. काही अडचण आली तर हे शेतकरीही तेथे आहेत आणि ट्रॅक्टर्सही. हे ट्रॅक्टर पुन्हा दिल्लीला जातील. या वेळी नांगर क्रांती होईल. शेतकरी आपले नांगर घेऊन रॅलीत सहभागी होतील, असा इशारा शेतकरी आंदोलनाचे नेते राकेश टिकैत यांनी दिला आहे.
महाराष्ट्रासोबतच देशातील कोरोना व्हायरस (Coronavirus ) संकट आता हळूहळू नियंत्रणात येत असल्याचे चित्र आहे. असे असतानाच हे संकट पुन्हा आव्हान म्हणून उभे राहणार का? असा सवाल उपस्थित होण्यासारखे चित्र आहे. गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रातील कोरोना (Coronavirus In Maharashtra) रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढते आहे. महाराष्ट्राच्या आरोग्य विभागने दिलेल्या ताज्या आकडेवारीनुसार पाठीमागील 24 तासात राज्यात तब्बल 4,787 जणांना कोरोना व्हायरस संक्रमण झाल्याचे पुढे आले आहे. तर तब्बल 40 जणांचा मृत्यू झाला आहे. यासोबत राज्यात 3,853 जणांना कोरोनातून डिस्चार्जही मिळाला आहे, अशी माहिती राज्याच्या आरोग्य विभागाने दिली आहे.
पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरण आणि त्यात वनमंत्री संजय राऊत यांचा होणारा उल्लेख यावरुन महाविकासआघाडी सरकार चांगलेच अडचणीत आले आहे. त्यात वनमंत्री संजय राठोड हे कोणाच्याही संपर्कात नाहीत. त्यामुळे चर्चेला अधिकच उधान आले आहे. महाविकासआघाडी सरकारवर प्रश्नांची सरबत्ती होत आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनाही या प्रकरणावरुन प्रसारमाध्यमांनी विचारणा केली. यावर अजित पवार म्हणाले. ते नॉट रिचेबल असले तरी आमच्या संपर्कात आहेत. गायब नाहीत. येत्या गुरुवारी ते प्रसारमाध्यमांशी बोलतील अशी महिती आहे.
भारतात आज सलग 10 व्या दिवशी पेट्रोल डिझेल दरांनी उच्चांग गाठला आहे. पेट्रोल डिझेलच्या दरात प्रचंड वाढ होताना दिसत आहे. पाठिमागील 18 दिवसांमध्ये 12 वेळा पेट्रोल-डिझेलच्या किमती वाढल्या आहेत. गेल्या काही दिवासांमध्ये पेट्रोल तब्बल 34 रुपयांनी महागले आहे. तर डिझेल 32 रुपये प्रतिलिटर दराने वाढले आहे. देशभरातील पेट्रोल डिझेलचे दर खालील प्रमाणे.
शहर पेट्रोल डीजल
मुंबई 96.32 87.32
दिल्ली 89.88 80.27
चेन्नई 91.98 85.31
कोलकाता 91.11 83.86
नोएडा 88.39 80.70
शेतकरी आंदोलन, राजकारण, समाज, संस्कृती, क्रीडा, विज्ञाण, कोरोना व्हायरस, कोरोना लस यांसर स्थानिक, प्रादेशीक आणि राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय घटना, घडामोडींचा ताजा तपशील जाणून घेण्यासाठी लेटेस्टली मराठी सोबत जोडलेले राहा.