Current Passed Through Carriage: लग्नाच्या मिरवणुकीत घोडागाडीत उतरला 11000 व्होल्टचा करंट; 2 कामगारांचा मृत्यू

लग्न समारंभात वापरण्यात येणाऱ्या गाडीला विजेचा धक्का बसला. ज्यामुळे दोन कामगारांचा जागीच मृत्यू झाला. ही घटना उघडकीस आल्यानंतर परिसरात घबराट पसरली आणि लोक जीव वाचवण्यासाठी पळू लागले.

Carriage प्रतिकात्मक प्रतिमा (फोटो सौजन्य - wikipedia)

Current Passed Through Carriage: उत्तर प्रदेशातील आझमगड जिल्ह्यात (Azamgarh District) बरदाह परिसरात एक दुर्दैवी अपघात घडला. येथे लग्नाचे वातावरण शोक सभेत बदलले. लग्न समारंभात वापरण्यात येणाऱ्या गाडीला विजेचा धक्का बसला. ज्यामुळे दोन कामगारांचा जागीच मृत्यू झाला. ही घटना उघडकीस आल्यानंतर परिसरात घबराट पसरली आणि लोक जीव वाचवण्यासाठी पळू लागले. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि कामगारांचे मृतदेह ताब्यात घेऊन ते शवविच्छेदनासाठी पाठवले.

शनिवारी रात्री आझमगड जिल्ह्यातील बरहाड भागात ही घटना घडली. प्राप्त माहितीनुसार, लोक वरातीत नाचत होते. त्याच वेळी अचानक वराच्या गाडीला जोडलेल्या एका सजावटीच्या फुलांच्या कुंडीला 11000 व्होल्टच्या वायरचा स्पर्श झाला. यामुळे संपूर्ण गाडीला विजेचा धक्का बसला. त्यानंतर हा दुर्दैवी अपघात घडला. या घटनेनंतर लग्नाच्या मिरवणुकीत गोंधळ उडाला. (हेही वाचा -Delhi: बायोमेट्रिकचा वापर करताना विद्यार्थिंनीला लागला विजेचा धक्का, रुग्णालयात उपचार सुरु)

गाडीत उतरला विद्युतप्रवाह -

गाडीत विद्युतप्रवाह उतरल्यानंतर दोन कामगारांचा मृत्यू झाला तसेच वर बेशुद्ध पडला. या घटनेमुळे लग्नाच्या मिरवणुकीत चेंगराचेंगरी झाली. लग्नाची मिरवणूक मेहनगर पोलीस स्टेशन परिसरातील कुसमिलिया गावातून बर्धा पोलीस स्टेशन परिसरातील भैस्कूर गावात येणार होती. नवऱ्या मुलाकडच्या लोकांनी वाटेत नाश्ता केला. त्यानंतर नवरा मुलगा गाडीवर बसला. त्यानंतर सर्वजण भैस्कुर गावाकडे निघाले. यावेळी काही कामगार डोक्यावर दिवे लावून सजावटीच्या फुलांच्या कुंड्या घेऊन चालत होते. (Karad Video: विजेचा धक्का लागल्याने दोन बैलांचा दुर्दैवी मृत्यू, तीन शेतकरी जखमी)

यादरम्यान, फुलदाणीचा 11 हजार व्होल्टच्या वायरला स्पर्श झाला आणि फुलदाणीसह गाडीला विजेचा झटका बसला. पोलिसांनी सांगितले की, मेहनगरमधील जवाहर नगर वॉर्डमधील रहिवासी गोलू (वय, 17) आणि मंगरू (वय, 25) यांचा विजेचा धक्का बसल्याने जागीच मृत्यू झाला, तर वर बेशुद्ध पडला. या घटनेमुळे लग्नाच्या मिरवणुकीत चेंगराचेंगरीची परिस्थिती निर्माण झाली.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement