राज्यातील कोरोना बाधितांची संख्या दिवसागणिक वाढत आहे. त्यामुळे अनेक जिल्हे, शहरं येथे कडक निर्बंध लादले जात आहेत. तर एकीकडे लसीकरणही सुरु आहे. कोविड-19 च्या वाढत्या संसर्गावर नियंत्रण आणण्यासाठी प्रशासन सज्ज झालं असून नागरिकांनाही नियमांचे पालन करण्याचे आवाहन करण्यात येत आहे. दरम्यान, मुंबईत सध्या तरी लॉकडाऊनची गरज नसल्याचे बीएमसी आयुक्त इक्बाल सिंह चहल यांनी सांगितले आहे.
जळगाव, नाशिक, नागपूर, अकोला यांसारख्या ठिकाणी कोरोना रुग्णवाढीमुळे कडक निर्बंध लादण्यात आले आहेत. तर उद्या महाशिवरात्री निमित्त जेजुरी येथे दोन दिवसांची जमावबंदी असणार आहे. कोकणातील कुणकेश्वर मंदिरही बंद असणार आहे. तसंच महाशिवरात्रीचा उत्सव साधेपणाने साजरा करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
आजच्या दिवसभरातील मुंबई, पुणे, नाशिक सह देशा-परदेशातील महत्त्वाच्या घडामोडी, ताज्या बातम्या जाणून घेण्यासाठी लेटेस्टली मराठी ला नक्की भेट द्या.
सध्या राज्यात मनसुख हिरेन आणि मोहन डेलकर या दोन मृत्यूंची जोरदार चर्चा आहे. या दोन मुद्द्यांवरुन सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोप होत आहेत. या प्रकरणात दररोज नवी माहिती, अपडेट समोर येत आहे. त्यामुळे पुढे ही प्रकरणं कशी मार्गी लागतात, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.