7th Pay Commission: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी खूशखबर! 9 हजार रुपयांनी वाढणार पगार, जाणून घ्या कशी होणार वाढ
7 व्या वेतन आयोगाच्या अहवालानुसार, केंद्रीय कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता 50 टक्क्यांच्या पुढे गेल्यावर, महागाई भत्ता शून्य होईल. महागाई भत्त्याची गणना 0 पासून सुरू होईल. त्याच वेळी, 50 टक्के दराने, कर्मचार्यांना भत्ता म्हणून जी काही रक्कम मिळणार आहे, तिचे मूळ वेतनात रूपांतर केले जाईल.
7th Pay Commission: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी येणारा काळ चांगलाच असणार आहे. तुम्ही अजूनही महागाई भत्त्याची वाट पाहत असाल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. येणाऱ्या काही दिवसांत सरकारी कर्मचाऱ्यांच्या पगारात बंपर वाढ होणार आहे. कर्मचाऱ्यांचा पगार 1-2 हजार रुपयांनी नाही तर 9000 रुपयांनी वाढू शकतो. सरकारच्या निर्णयामुळे हे शक्य होणार आहे. हे सर्व कसं घडणार आहे ते जाणून घेऊयात. केंद्रीय कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता अद्याप जाहीर झालेला नाही. पण, आता पुढील वर्षीच्या महागाई भत्त्याची मोजणी सुरू झाली आहे. या आकडेवारीत महागाई भत्त्याचा आलेख 47 टक्क्यांच्या पुढे गेला आहे. जुलै महिन्यात भाजीपाला आणि फळांच्या किमतीत वाढ झाल्यामुळे महागाई निर्देशांकात मोठी वाढ झाली आहे. ऑगस्टमध्येही महागाईचा आलेख वाढताना दिसत आहे. अशा स्थितीत सप्टेंबरअखेर येणाऱ्या आकडेवारीत लक्षणीय वाढ होऊ शकते.
महागाई निर्देशांकातील वाढ जुलै ते डिसेंबर दरम्यान महागाई भत्त्याची संख्या ठरवेल. याचा अर्थ, जानेवारी 2024 पासून लागू होणारा महागाई भत्ता या क्रमांकावरून ठरवला जाईल. येत्या वर्षभरात कर्मचाऱ्यांचा डीए किती वाढणार हे येणारा काळच सांगेल. परंतु, जो हिशोब मांडला जात आहे, त्यानुसार कर्मचाऱ्यांच्या पगारात मोठी वाढ होणार आहे. (हेही वाचा - 7th Pay Commission: केंद्रीय सेवेतील कर्मचाऱ्यांच्या Dearness Allowance मध्ये सप्टेंबरमध्ये वाढ होण्याची शक्यता)
31 ऑगस्ट रोजी, कामगार ब्युरोने जुलैचा AICPI निर्देशांक जारी केले होते. यामध्ये 3.3 अंकांची उसळी पाहायला मिळाली. जुलैमध्ये निर्देशांक 139.7 अंकांवर पोहोचला आहे. त्यामुळे महागाई भत्त्याच्या स्कोअरलाही पाठिंबा मिळाला आणि डीए 47.14 टक्क्यांवर पोहोचला. तथापि, अंतिम आकड्यांसाठी डिसेंबर 2023 पर्यंत डेटाची प्रतीक्षा करावी लागेल. परंतु, महागाई निर्देशांकाच्या वाढत्या गतीने महागाई भत्ता 50 टक्क्यांच्या पुढे जाऊ शकतो हे निश्चित.
7 व्या वेतन आयोगाच्या अहवालानुसार, केंद्रीय कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता 50 टक्क्यांच्या पुढे गेल्यावर, महागाई भत्ता शून्य होईल. महागाई भत्त्याची गणना 0 पासून सुरू होईल. त्याच वेळी, 50 टक्के दराने, कर्मचार्यांना भत्ता म्हणून जी काही रक्कम मिळणार आहे, तिचे मूळ वेतनात रूपांतर केले जाईल.
पगारात 9000 रुपयांनी वाढ होणार -
महागाई भत्ता 50 टक्क्यांपर्यंत पोहोचताच त्यात सुधारणा केली जाईल. 2016 मध्ये सरकारने जारी केलेल्या मेमोरँडमच्या आधारे हे होईल. 50 टक्के डीएचे पैसे मूळ वेतनात विलीन केले जातील. समजा एखाद्या कर्मचाऱ्याचा मूळ पगार 18000 रुपये असेल तर त्याला 9000 रुपयांच्या 50 टक्के DA मिळेल. परंतु, जर डीए 50 टक्के असेल, तर तो मूळ पगारात जोडला जाईल आणि महागाई भत्ता शून्यावर आणला जाईल, तर कर्मचार्याच्या पगारात 9000 रुपयांची वाढ होईल आणि तो थेट त्याच्या हातात येईल.
(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)