Seven Telangana Students Die by Suicide: धक्कादायक! तेलंगणामध्ये बारावीच्या परीक्षेत नापास झाल्याने 48 तासांत 7 विद्यार्थ्यांची आत्महत्या
द इंडियन एक्स्प्रेसच्या वृत्तानुसार, मंचेरियल जिल्ह्यात पहिले प्रकरण नोंदवले गेले होते, जेथे 16 वर्षीय तरुणाने त्याच्या राहत्या घरी गळफास लावून घेतला होता. विद्यार्थी चार विषयात नापास झाला होता. तसेच दुसऱ्या एका घटनेत विद्यार्थ्यांने गळफास लावून आपलं जीवन संपवलं.
Seven Telangana Students Die by Suicide: तेलंगणात (Telangana) बारावीच्या परीक्षेत नापास झाल्याने गेल्या 48 तासांत 7 विद्यार्थ्यांनी आत्महत्या (Suicide) केली. या सर्व घटना तेलंगणातील आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, आत्महत्या केलेली सर्व मुले तेलंगणा बोर्डाच्या इंटरमिजिएट परीक्षेत नापास झाली होती. मंडळाने 24 एप्रिललाच प्रथम वर्ष आणि द्वितीय वर्षाचे निकाल जाहीर केले होते.
बुधवारी निकाल जाहीर झाल्यानंतर गेल्या 48 तासांत सात विद्यार्थ्यांचा मृत्यू झाल्याची नोंद पोलिसांनी केली, असे पीटीआयने वृत्त दिले आहे. महबूबादचे पोलीस अधीक्षकांनी सांगितले की, ज्या दोन मुलींनी आत्महत्या केली त्या परीक्षेत नापास झाल्या होत्या. हैदराबाद, खम्मम, महबूबाबाद आणि कोल्लूरच्या बाहेरील राजेंद्रनगर येथे ही प्रकरणे नोंदवली गेली. (हेही वाचा -Delhi Murder Case: आईस्क्रिम विकणाऱ्या तरुणाची हत्या, अल्पवयीन मुलीसह दोघांना अटक)
द इंडियन एक्स्प्रेसच्या वृत्तानुसार, मंचेरियल जिल्ह्यात पहिले प्रकरण नोंदवले गेले होते, जेथे 16 वर्षीय तरुणाने त्याच्या राहत्या घरी गळफास लावून घेतला होता. विद्यार्थी चार विषयात नापास झाला होता. तसेच दुसऱ्या एका घटनेत विद्यार्थ्यांने गळफास लावून आपलं जीवन संपवलं. (हेही वाचा-प्रॉपर्टीच्या वादामधून वडिलांनीच दिली पोटच्या पोराला मारायला 75 लाखांची सुपारी)
या वर्षाच्या सुरुवातीला घेण्यात आलेल्या इंटरमिजिएट परीक्षेला 9.8 लाखांहून अधिक विद्यार्थी बसले होते. सुमारे 61.06% विद्यार्थी (2.87 लाख) पहिल्या वर्षी (इयत्ता 11वीच्या समतुल्य) उत्तीर्ण झाले. दुसऱ्या वर्षी उत्तीर्णतेची टक्केवारी 69.46% (3.22 लाख) होती.
दरम्यान, 2019 मध्ये, मध्यंतरी निकाल जाहीर झाल्यानंतर तेलंगणामध्ये 22 विद्यार्थ्यांनी आत्महत्या केली. देशातील विद्यार्थ्यांच्या आत्महत्यांमध्ये तेलंगणाचा वाटा 5 टक्के आहे. नॅशनल क्राइम रेकॉर्ड ब्युरोनुसार 2022 मध्ये राज्य 28 राज्यांमध्ये 11 व्या क्रमांकावर आहे. महाराष्ट्र, तामिळनाडू आणि मध्य प्रदेश या तीन राज्यांमध्ये सर्वाधिक विद्यार्थी आत्महत्या झाल्या आहेत.
(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)