करण जौहर नंतर आता शाहरुख सोबत कार्तिक आर्यन तुटली मैत्री, जाणून घ्या नेमके काय आहे प्रकरण

बॉलिवुड मधील प्रसिद्ध दिग्दर्शक, निर्माता करण जौहर (Karan Johar) याच्या दोस्ताना-2 (Dostana 2) नंतर अभिनेता कार्तिक आर्यन (Kartik Aaryan) याच्या हातून आणखी एक प्रोजेक्ट गेल्याचे समोर आले आहे.

Kartik Aaryan (Photo Credits: YouTube)

बॉलिवुड मधील प्रसिद्ध दिग्दर्शक, निर्माता करण जौहर (Karan Johar) याच्या दोस्ताना-2  (Dostana 2) नंतर अभिनेता कार्तिक आर्यन (Kartik Aaryan) याच्या हातून आणखी एक प्रोजेक्ट गेल्याचे समोर आले आहे. असे बोलले जात आहे की, कार्तिक आर्यन हा किंग खान (King Khan) याचे प्रोडक्शन रेड चिलीज (Red Chillies) अंतर्गत तयार होणारा फ्रैडी चित्रपटातून बाहेर पडला आहे. कार्तिकने त्याला या चित्रपटासाठी मिळालेली 2 कोटी रुपयांची रक्कम सुद्धा परत केली आहे.

सुत्रांनुसार, कार्तिक याने शाहरुख खान याच्या चित्रपटातून बाहेर पडण्यामागील कारण हे करण जौहर याचा दोस्ताना-2 चित्रपट सारखेच होते. यावेळी कार्तिक याने चित्रपट साइन करण्यासह कथेवर मान्यता व्यक्त केल्यानंतर स्क्रिप्टमध्ये बदल करण्याच मागणी केली होती. त्यामुळे आता सुद्धा प्रोडक्शन हाउसला कार्तिक याला चित्रपटातून बाहेर काढावे लागले आहे.(Kiss Controversy नंतर अनेक वर्षांनी Rakhi Sawant व Mika Singh यांची भेट; आपण आता मित्र असल्याची मिडियासमोर कबुली Watch Video)

 

View this post on Instagram

 

A post shared by KARTIK AARYAN (@kartikaaryan)

शाहरुख खान याच्या प्रोडक्शनसाठी दिलासादायक बाब ही आहे की, चित्रपट अद्याप फ्लोअवर आलेला नाही. यासाठी प्रोडक्शनला कार्तिक याला बाहेर काढल्यामुळे मोठे नुकसान झालेले नाही. आता नव्या लीड रोलसाठी कलाकाराचा शोध घेतला जाणार आहे.

फ्रैडीमध्ये कार्तिकसह कतरिना कैफ सुद्धा चित्रपटात दिसून येणार होती. मात्र आता कार्तिक चित्रपटातून बाहेर पडल्यानंतर या दोघांमधील केमिस्ट्री पाहण्यासाठी प्रेक्षकांना अजून वाट पहावी लागणार आहे. कार्तिकचे लागोपाठ दोन चित्रपट हातातून गेल्यानंतर सोशल मीडियात नवा वाद सुरु झाला आहे. काही लोकांचे असे म्हणणे आहे की, कार्तिकने असे करत असेल तर तो त्याच्या परिवाराला धोक्यात टाकत आहे. तर काहीजण हा करण जौहरचा गेम असल्याचे म्हणत आहेत. करण जौहर याच्या कारणामुळे रेड चिलीजने कार्तिक याला बाहेरचा रस्ता दाखवला आहे. मात्र सत्य नेमके काय हे माहिती नाही. मात्र गेल्या दिवसामध्ये जेव्हा कार्तिक याच्या हातातून चित्रपट गेल्याच्या बातम्यांवर प्रश्न उपस्थितीत करण्यात आले तेव्हा त्याने आता जाऊदे असे म्हटले.

(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)

Share Now

Share Now