Asia Cup पूर्वी IND आणि PAK च्या दिग्गजांमध्ये शाब्दिक युद्ध, Waqar Yunus च्या ट्विटला Irfan Pathan ने दिले चोख प्रत्युत्तर

भारताचे दोन आघाडीचे गोलंदाज जसप्रीत बुमराह आणि हर्षल पटेल दुखापतींमुळे आशिया चषक स्पर्धेतून बाहेर पडले आहेत. त्याचवेळी आफ्रिदीला स्पर्धा सुरू होण्याच्या आठवडाभरापूर्वी दुखापत झाल्याने पाकिस्तानला मोठा धक्का बसला आहे.

Waqar Yunus And Irfan Pathan (Photo Credit - Twitter)

पाकिस्तानचा युवा वेगवान गोलंदाज शाहीन शाह आफ्रिदी (Shaheen Shah Afridi) दुखापतीमुळे आशिया चषक 2022 (Asia Cup 2022) मधून बाहेर पडला आहे. पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने (PCB) शनिवारी ही माहिती दिली. गुडघ्याच्या दुखापतीमुळे आफ्रिदी आगामी आशिया चषक आणि इंग्लंडविरुद्धच्या घरच्या मालिकेला मुकणार आहे, ज्यामुळे संघाच्या आशांना मोठा धक्का बसला आहे. यापूर्वी भारताचे दोन आघाडीचे गोलंदाज जसप्रीत बुमराह आणि हर्षल पटेल दुखापतींमुळे आशिया चषक स्पर्धेतून बाहेर पडले आहेत. त्याचवेळी आफ्रिदीला स्पर्धा सुरू होण्याच्या आठवडाभरापूर्वी दुखापत झाल्याने पाकिस्तानला मोठा धक्का बसला आहे. मात्र, आफ्रिदीच्या आशिया चषकातून बाहेर पडल्याने भारतीय आघाडीच्या फळीला दिलासा मिळाला असेल, असे मत पाकिस्तानचे माजी दिग्गज खेळाडू वकार युनूस (Waqar Yunus) यांनी व्यक्त केले. त्याने केलेल्या या ट्विटवर चाहत्यांनी त्याच्यावर जोरदार टीका केली असून आता भारताचा दिग्गज इरफान पठाणनेही (Irfan Pathan) या वादात उडी घेतली आहे.

बुमराह आणि पटेल यांच्या अनुपस्थितीमुळे विरोधी संघांना दिलासा मिळेल, असे इरफान पठाणने ट्विट करून लिहिले आहे. पठाणने ट्विट करून लिहिले की, “बुमराह आणि हर्षल या आशिया कपमध्ये खेळत नाहीत ही इतर संघांसाठी दिलासादायक गोष्ट आहे! (हे देखील वाचा: IND vs ZIM 3rd ODI: तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात भारतीय संघ देवू शकतो नवीन खेळाडूंना संधी, अशी असू शकते प्लेइंग इलेव्हन)

Tweet

भारत आणि पाकिस्तान 28 ऑगस्टला आमनेसामने 

बोर्डाने सांगितले की, शाहीनला टी-20 आशिया कप आणि इंग्लंडविरुद्धच्या सात सामन्यांच्या टी-20 मालिकेतून वगळण्यात आले आहे. न्यूझीलंडमध्ये तिरंगी मालिका होणार आहे तेव्हा ऑक्टोबरपर्यंत तो स्पर्धात्मक क्रिकेटमध्ये परतेल. त्यानंतर ऑस्ट्रेलियात टी-२० विश्वचषक होणार आहे. शाहीनला गेल्या महिन्यात गाले येथे श्रीलंकेविरुद्धच्या कसोटीदरम्यान उजव्या गुडघ्याला दुखापत झाली होती. दुबईत होणाऱ्या आशिया चषक स्पर्धेत भारत आणि पाकिस्तान 28 ऑगस्टला आमनेसामने येणार आहेत.

(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)

Share Now

Share Now