Women's Asia Cup 2022: 1 ऑक्टोबरपासून स्पर्धेला होणार सुरुवात; भारताचे वेळापत्रक, वेळ आणि लाइव्ह स्ट्रीमिंग जाणून घ्या
Womens Team India (Photo Credit - Twitter)

महिला आशिया चषक 2022 (Women's Asia Cup 2022) ची सुरुवात 1 ऑक्टोबरपासून सुरू होत आहे. यजमान बांगलादेश संघ थायलंडविरुद्ध सामना खेळून स्पर्धेची सुरुवात होईल. त्याचबरोबर हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखालील टीम इंडिया (Team India) आपला पहिला सामना श्रीलंकेविरुद्ध (IND vs SL) खेळणार आहे. या बहुराष्ट्रीय स्पर्धेत भारत, बांगलादेश, श्रीलंका आणि थायलंडशिवाय पाकिस्तान, मलेशिया आणि यूएईचे संघ सहभागी होत आहेत. आशिया चषक 2022 राऊंड रॉबिन आधारावर खेळला जाईल म्हणजे सर्व संघांना एकमेकांविरुद्ध किमान एक सामना खेळावा लागेल. गुणतालिकेत अव्वल 4 संघ उपांत्य फेरीत पोहोचतील. उपांत्य फेरीचे दोन्ही सामने 13 ऑक्टोबरला, तर स्पर्धेचा अंतिम सामना 15 ऑक्टोबरला होणार आहे.

टीम इंडियाच्या वेळापत्रकाबद्दल बोलायचे झाले तर 1 ऑक्टोबरला श्रीलंकेविरुद्ध सामना खेळल्यानंतर भारताला 3 ऑक्टोबरला मलेशिया आणि 4 ऑक्टोबरला यूएईचा सामना करावा लागणार आहे. यानंतर टीम इंडिया असा सामना खेळणार आहे ज्याची चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत. 7 ऑक्टोबरला भारताचा सामना कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानशी होणार आहे. त्यानंतर भारत 8 आणि 10 ऑक्टोबर रोजी बांगलादेश आणि थायलंड विरुद्ध खेळेल. भारतीय सामने दुपारी एक वाजता सुरू होतील.

आशिया कप 2022 मध्ये टीम इंडियाचे वेळापत्रक आणि वेळ

1 ऑक्टोबर - भारत विरुद्ध श्रीलंका, दुपारी 1 वा

3 ऑक्टोबर - भारत विरुद्ध मलेशिया, दुपारी 1 वा

4 ऑक्टोबर - भारत विरुद्ध यूएई, दुपारी 1 वा

7 ऑक्टोबर - भारत विरुद्ध पाकिस्तान, दुपारी 1 वा

8 ऑक्टोबर - भारत विरुद्ध बांगलादेश, दुपारी 1 वा

10 ऑक्टोबर - भारत विरुद्ध थायलंड, दुपारी 1 वा

आशिया चषक 2022 साठी भारतीय संघ

हरमनप्रीत कौर (कर्णधार), स्मृती मानधना (उप-कर्णधार), दीप्ती शर्मा, शफाली वर्मा, जेमिमा रॉड्रिग्स, सबबिनिनी मेघना, रिचा घोष (विकेटकीपर), स्नेह राणा, दयालन हेमलता, मेघना सिंह, रेणुका ठाकूर, पूजा वस्त्रकार, राजेश्वरी गायकवाड, राधा यादव, के.पी. नवगीर  राखीव खेळाडू: तानिया सपना भाटिया, सिमरन दिल बहादूर

कुठे पाहणार सामना

तुम्ही विविध स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवर महिला आशिया चषक 2022 च्या सर्व सामन्यांचा आनंद घेऊ शकता. तर, मोबाईल किंवा लॅपटॉपवर हे सामने पाहण्यासाठी तुम्ही डिस्ने प्लस हॉटस्टारवर लॉग इन करू शकता. (हे देखील वाचा: T20 World Cup 2022 Prize Money: टी20 विश्वचषक ट्रॉफीसाठी ICC कडून 45 कोटी रुपयांची एकूण बक्षीस रक्कम जाहीर)

आशिया कपमधील भारतीय महिला क्रिकेट संघाचा इतिहास

महिला आशिया कपची पहिली आवृत्ती 2004 मध्ये एकदिवसीय स्वरूपात खेळली गेली. श्रीलंकेत झालेल्या या स्पर्धेत टीम इंडियाला विजय मिळवण्यात यश आले. यानंतर पुढील तीन वर्षे आणि आशिया चषक एकदिवसीय स्वरूपात खेळला गेला. 2012 मध्ये पहिल्यांदा ही स्पर्धा T20 फॉरमॅटमध्ये खेळली गेली. आतापर्यंत ही स्पर्धा 7 वेळा आयोजित करण्यात आली असून यामध्ये टीम इंडियाने 6 वेळा विजय मिळवला आहे. 2018 मध्ये बांगलादेशने अंतिम फेरीत भारताचा पराभव करून मोठा अपसेट करून हे विजेतेपद पटकावले होते.