Asia Cup 2020: श्रीलंकामध्ये आशिया चषक आयोजित होण्याची शक्यता, आयोजनाचे हक्क अदला-बदल करण्यासाठी पाकिस्तान सज्ज

2020 सप्टेंबरमध्ये ठरलेल्या वेळेत आशिया चषक होण्याची शक्यता कोविड-19 मुळे अस्पष्ट आहे परंतु जर तसे झाले तर पाकिस्तानऐवजी श्रीलंकेट त्याचे आयोजन केले जाण्याची शक्यता आहे. पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने (पीसीबी) श्रीलंका क्रिकेटला (एसएलसी) आयोजनाचे हक्क अदला-बदल करण्याची ऑफर दिली आहे.

श्रीलंका (Photo Credit: Getty Images)

2020 सप्टेंबरमध्ये ठरलेल्या वेळेत आशिया चषक (Asia Cup) होण्याची शक्यता कोविड-19 मुळे अस्पष्ट आहे परंतु जर तसे झाले तर पाकिस्तानऐवजी (Pakistan) श्रीलंकेत (Sri Lanka) त्याचे आयोजन केले जाण्याची शक्यता आहे. पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने (PCB) श्रीलंका क्रिकेटला (SLC) आयोजनाचे हक्क अदला-बदल करण्याची ऑफर दिली आहे. पाकिस्तान या वर्षाच्या आवृत्तीचे मूळ यजमान होते, परंतु भारताशी (India) असलेला तणाव आणि कोविड-19 (COVID-19) ची सद्यस्थिती लक्षात घेता पीसीबीने एशिया कपच्या या आवृत्तीचे आयोजन करण्यासाठी एसएलसी देण्याचे ठरविले आहे आणि त्या बदल्यात 2022 च्या आवृत्तीचे होस्टिंग हक्क मिळविले आहेत, असे ESPNCricinfo ने नोंदवले. तथापि, एसीसीच्या कार्यकारी परिषदेने अद्याप यजमान देशांच्या अदला-बदलीला मान्यता दिली नाही परंतु महिन्याच्या अखेरीस आयोजनाच्या योजनांची पुष्टी होणे अपेक्षित आहे. (Asia Cup 2020: आशिया चषक आयोजनाचा पाकिस्तानने सोडला हट्ट? श्रीलंकामध्ये खेळवण्यासाठी PCB ने हिरवा कंदील दाखविल्याचा SLC चा दावा)

पाकिस्तान-श्रीलंकामध्ये आयोजनपदाची देवाणघेवाण होण्यामागील दोन कारणे म्हणजे भारत आणि पाकिस्तानमधील सध्याचे संबंध फार चांगले नाहीत आणि दुसरे म्हणजे, आयलँडच्या देशात कोरोना व्हायरस सर्वत्र नियंत्रित आहे. मात्र, निर्बंध आणि तार्किक अडथळ्यांमुळे यंदा स्पर्धा नियोजित योजनेप्रमाणे पुढे जाईल का याची शंका आहे.

2010 पासून श्रीलंकामध्ये आशिया चषक स्पर्धा आयोजित केली गेली नाही आणि घरातील लोकांना आकर्षित करण्याची संधी मिळविण्याचा ते प्रयत्न करत आहेत. भारताने मागील आशिया चषक स्पर्धेत बांग्लादेशचा प्रभाव करून विजेतेपद पटकावले होते. 9 जून रोजी एशियन क्रिकेट कौन्सिलच्या (एसीसी) कार्यकारी मंडळाची एक व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे बैठक झाली आणि आशिया चषक 2020 विषयी अंतिम निर्णय महिन्याअखेरीस ढकलण्यात आला. दरम्यान, गुरुवारी कोरोना व्हायरस आणि प्रवासावरील निर्बंधाचा हवाला देत भारताने श्रीलंकेचा दौरा स्थगित केला. या महिन्याच्या शेवटी भारतीय संघ तीन वनडे आणि 3 टी-20 सामन्यांसाठी श्रीलंका दौर्‍यावर जाणार होता.

(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement