रोहित शर्मा बंद स्टेडियममध्ये IPL खेळणार? पाहा काय म्हणाला मुंबई इंडियन्सचा कर्णधार
मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्मा रिकाम्या स्टेडियममध्ये खेळण्यास सज्ज झाला आहे याची मानसिकता तयार करण्यासाठी उपयुक्त उपायही सांगितलं. रोहितला इंडिया टुडेच्या ई-कॉन्क्लेव्ह दरम्यान असंख्य विषयांवर बोलताना विचारले की जर आयपीएलला बंद स्टेडियममध्ये खेळण्याची परवानगी दिली गेली तर प्रेक्षकांशिवाय खेळताना कसे वाटेल.
जगभर कोविड-19 चा वेगवान वाढणाऱ्या प्रसारामुळे अनेक क्रिकेट मालिका रद्द वा पुढे ढकलण्यात आल्या आहेत. इंडियन प्रीमिअर लीग (Indian Premier League) सरकारकडून पुढील सूचना येई पर्यंत स्थगित करण्यात आले आहे. तथापि, जर काही प्रमाणात गोष्टी सामान्य झाल्या तर टी-20 च्या टूर्नामेंट रिकाम्या स्टेडियममध्ये खेळली जाऊ शकते असे म्हटले जात आहे. आयपीएलच्या मागील सत्रांमध्ये प्रेक्षां त्यांच्या आवडत्या क्रिकेटपटूंना खेळताना पाहण्यासाठी मोठ्या संख्येने स्टेडियममध्ये हजेरी लावायचे. म्हणून, प्रेक्षकांशिवाय खेळणे खेळाडूंसाठी नक्कीच अस्ताव्यस्त असेल. मात्र, मुंबई इंडियन्सचा (Mumbai Indians) कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) रिकाम्या स्टेडियममध्ये खेळण्यास सज्ज झाला आहे याची मानसिकता तयार करण्यासाठी उपयुक्त उपायही सांगितलं. रोहितला इंडिया टुडेच्या ई-कॉन्क्लेव्ह दरम्यान असंख्य विषयांवर बोलताना विचारले की जर आयपीएलला बंद स्टेडियममध्ये खेळण्याची परवानगी दिली गेली तर प्रेक्षकांशिवाय खेळताना कसे वाटेल. (एमएस धोनी की रोहित शर्मा; गौतम गंभीर, संजय बांगर यांनी निवडला IPL इतिहासातील सर्वोत्कृष्ट कर्णधार)
रोहित म्हणाला, "रिकाम्या स्टेडियममध्ये खेळणे थोडे विचित्र होईल, चाहते हे कसे घेतील हे मला माहित नाही. लहान मुलाच्या रूपात मला एक मोठा रास्ता गाठावा लागेल आणि मी कसं क्रिकेट खेळण्यास सुरुवात केली याचा विचार करावा लागेल. आमच्याकडे या विलासी स्टेडियममध्ये खेळण्याची लक्झरी नव्हती, मला वाटते की आयुष्य त्याकडे परत जाईल. बोर्डाचे जे काही नियम असतात आणि ते पाळले पाहिजे आणि असेच काही क्रिकेट खेळायला हवे. लोक आम्हाला टेलीव्हिजनवर पाहण्यास सक्षम असतील. कमीतकमी पुढे काहीतरी पाहायला मिळेल."
शिवाय, टी-20 टूर्नामेंट एकाच शहरात किंवा भारतात बाहेर आयोजित केली जाऊ शकते अशीही शक्यता वर्तवली जात होती. यावर बोलताना रोहित म्हणाला की, त्यांनी स्पर्धेचे भवितव्य काय आहे याचा विचार करण्यापूर्वी सरकारच्या निर्देशांची प्रतीक्षा करावी. तो म्हणाला, "होय, एकदा स्टेडियम उघडल्यानंतर आमच्यासाठी फिक्स्चर सेट करता येतील. तरच हे कसे चालू ठेवले जाईल हे आम्हाला कळेल. सध्या न फिरता एकाच ठिकाणी राहणे अधिक महत्वाचे आहे असा माझा विश्वास आहे. कोणत्याही शहर किंवा देशामध्ये, जिथे स्पर्धा होत आहेत त्यांना, या विषाणूंपासून दूर राहण्यासाठी आवश्यक ती सर्व खबरदारी आणि सर्व पावले उचलावी लागतील."
(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)