IND 154/2 in 15.4 Overs | IND vs BAN 2nd T20I 2019 Live Score Updates: टीम इंडियाचा 8 विकेटने विजय, मालिका 1-1 ने बरोबरीत
राजकोटच्या सौराष्ट्र क्रिकेट असोसिएशन स्टेडियमवर आज भारत आणि बांगलादेश यांच्यात एक महत्त्वाचा सामना खेळला जाणार आहे. आजचा सामना जिंकणे भारतासाठी अत्यंत महत्वाचे आहे.
रोहित शर्मा याच्या नेतृत्वात भारतीय क्रिकेट संघाने बांग्लादेशविरुद्ध दुसऱ्या टी-20 सामन्यात विकेटने विजयाची नोंद केली आहे. यासह भारताने 3 सामन्यांच्या मालिकेत 1-1 ने बरोबरी केली आहे. भारताने 8 विकेटने विजयाची नोंद केली. आता दोन्ही संघातील मालिकेचा निर्णय नागपूरमध्ये 10 नोव्हेंबरला होईल.
टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मा याचे पाचवे टी-२० शतक हुकले. अमिनुल इस्लाम याच्या गोलंदाजीवर 85 धावांवर रोहित बाद झाला. रोहितने आज 6 चौकार आणि 6 षटकार लगावत संघाला विजयाच्या जवळ नेले.
टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मा याचे पाचवे टी-२० शतक हुकले. अमिनुल इस्लाम याच्या गोलंदाजीवर 85 धावांवर रोहित बाद झाला. रोहितने आज 6 चौकार आणि 6 षटकार लगावत संघाला विजयाच्या जवळ नेले.
भारतीय संघाचा सलामी फलंदाज शिखर धवन अमीनुल इस्लाम याच्या चेंडूवर षटकार मारण्याच्या प्रयत्नात बोल्ड झाला. धवनने आज 27 चेंडूंचा सामना केला आणि चार चौकारांच्या मदतीने 31 धावा केल्या.
भारतीय संघाचा सध्याचा कर्णधार रोहित शर्माने चमकदार फलंदाजी करत टी -20 क्रिकेट कारकीर्दीचे 18 वे अर्धशतक पूर्ण केले आहे. या खेळीदरम्यान शर्माने 23 चेंडूंचा सामना करत 6 चौकार आणि तीन षटकार ठोकले. शर्मा सध्या 53 धावांवर खेळत आहे.
टीम इंडियाकडून डावाची सुरुवात करण्यासाठी आलेल्या शिखर धवन आणि रोहित शर्मा यांनी संघाला वेगवान सुरुवात करून दिली. दोन्ही फलंदाज बांग्लादेशी गोलंदाजांसमोर सावधपणे खेळत आहे. दोघे संधी शोधत चौकार आणि षटकार ठोकत आहे.
बांग्लादेशने दिलेल्या 154 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या टीम इंडियाने पहिल्या ओव्हरमध्ये 11 धावा केल्या. रोहित शर्मा आणि शिखर धवन यांनी भारताकडून डावाची सुरुवात केली.
भारतीय संघाचा स्टार फिरकी गोलंदाज युजवेंद्र चहल याने या सामन्यात दुसरी विकेट घेत संघाला चौथे यश मिळवून दिले. चहलच्या गोलदांडाजीवर मोठा शॉट खेळण्याच्या प्रयत्नात बांगलादेश मधल्या फळीतील फलंदाज सौम्य सरकारला यष्टीरक्षक रिषभ पंतने झेलबाद केले. सरकारने आज 30 चेंडूंचा सामना करत दोन चौकार आणि एका षटकाराच्या मदतीने 30 धावा केल्या.
टॉस गमावल्यानंतर प्रथम फलंदाजी करणा Bangladesh्या बांगलादेशच्या संघाने 12.3 षटकांत तीन गडी गमावल्यानंतर 100 धावा पूर्ण केल्या. सौम्य सरकार 29 आणि संघाचा कर्णधार महमूदुल्ला 0 खेळत आहे.
11 व्या ओव्हरमध्ये वॉशिंग्टन सुंदरने भारताला दुसरे यश मिळवून दिले. तिसर्या चेंडूवर मोहम्मद नईम श्रेयस अय्यर याच्या हाती झेल बाद झाला. नईमने 31 चेंडूत पाच चौकारांसह 36 धावा केल्या.
आठव्या ओव्हरच्या दुसर्या चेंडूवर भारताला पहिले यश मिळाले. रिषभ पंतने लिटन दासला 29 धावांवर धावबाद केले. 7 व्या ओव्हरमध्ये लिटन दासला जीवदान देण्यात आले. तिसर्या बॉलवर कर्णधार रोहित शर्माने दासचा झेल सोडला.
टॉस गमावल्यानंतर बांग्लादेश पहिले फलंदाजीसाठी मैदानात आला आणि पहिला पॉवरप्ले संपल्यानंतर एकही विकेट न गमावता 54 धावा केल्या. संघासाठी मोहम्मद नईम 20 चेंडूंत 17 आणि लिट्टन दास 17 चेंडूत 26 धावा करत खेळत आहेत.
टॉस जिंकून भारताने बांग्लादेशला पहिले फलंदाजी करण्यासाठी बोलावले. याच्या प्रत्युत्तरात बांग्लादेशचे सलामी फलंदाज लिटन दास आणि मोहम्मद नईम यांनी शानदार सुरुवात केली. पहिले, दीपक चाहर आणि नंतर खालील अहमद याच्याविरुद्ध जोरदार फलंदाजी करत 3 ओव्हरमध्ये 23 धावा केल्या आहेत.
बांगलादेशविरुद्ध दुसऱ्या टी-20 मॅचमध्ये टॉस जिंकून भारताचा कर्णधार रोहित शर्मा याने पहिले गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. राजकोटच्या सौराष्ट्र क्रिकेट असोसिएशन क्रिकेट स्टेडियममध्ये खेळला जाणारा आजचा सामना टीम इंडियासाठी महत्वाचा आहे. आजच्या या सामन्यात भारतीय संघात कोणताही बदल नाही करण्यात आला आहे.
राजकोटच्या सौराष्ट्र क्रिकेट असोसिएशन (Saurashtra Cricket Association) स्टेडियमवर आज भारत (India) आणि बांगलादेश (Bangladesh) यांच्यात एक महत्त्वाचा सामना खेळला जाणार आहे. आजच्या सामन्यात तीन सामन्यांच्या मालिकेचा निकाल निश्चित होणार आहे. बांग्लादेश संघाने तीन सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना जिंकून मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली. आजच्या मॅचमध्ये टीम इंडियासमोर करो या मरो सारखी स्थिती आहे. आजचा सामना जिंकणे भारतासाठी अत्यंत महत्वाचे आहे अन्यथा तो मालिका गमावून बसेल, त्यामुळे, आता भारत हा सामना जिंकून मालिकेट बरोबरी साधण्याचा प्रयत्न करेल. या मॅचदरम्यान पावसाची शक्यता वर्तवली जात आहे. या सामन्यावर 'महा' (Maha) चक्रीवादळाचे सावट होते, परंतु सकाळी मिळालेल्या माहितीनुसार चक्रीवादळ कमकुवत झाले आहे आणि सामना दरम्यान पावसाची शक्यता आहे पण त्याचा त्याचा फारसा परिणाम होणार नाही. (सामन्याचा लाईव्ह स्कोअर पाहण्यासाठी येथे क्लिक करा)
पहिल्या सामन्यात भारतीय खेळाडूंचे प्रदर्शन समाधानकारक राहिले नाही. फलंदाजी आणि अन्य क्षेत्रात त्यांना पराभव कामगिरी करता आली नाही. शिवाय, दरवेळी प्रमाणे भारताची मध्यम क्रमाला अजून किती परिणामकारक कामगिरी करायचे आहे हे दिसून आले. कर्णधार विराट कोहली याची अनुपस्थिती जाणवून आली. युवा फलंदाज श्रेयस अय्यर, के एल राहुल आणि रिषभ पंत चांगला खेळ करू शकले नाही. त्यामुळे, आजच्या सामन्यात भारतीय संघात काही बदल होतात की नाही यावर सर्वांचे लक्ष लागून असणार आहे.