IND vs SL: टी-20 नंतर कर्णधार रोहित शर्माची आता होणार रेड बॉलमध्ये ‘कसोटी’, बॅटिंग ऑर्डर बनली मोठी डोकेदुखी

IND vs SL Test 2022: टी-20 मालिकेत श्रीलंकेचा 3-0 असा क्लीन स्वीप केल्यानंतर आता टीम इंडिया आता कसोटी मालिकेतही श्रीलंकेचा पूर्ण सफाया करण्यासाठी सज्ज आहे. रोहित शर्मा टी-20 परीक्षेत 100 पैकी 100 गुणांनी उत्तीर्ण झाला. पूर्णवेळ कर्णधार म्हणून रोहित प्रथमच कसोटी संघाचे नेतृत्व करणार असून आता त्याची रेड चेंडू क्रिकेटमधील सर्वात मोठी कसोटी लागणार आहे.

रोहित शर्मा (Photo Credit: PTI)

IND vs SL Test 2022: भारत (India) आणि श्रीलंका (Sri Lanka) यांच्यातील दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिला सामना 4 मार्च रोजी सकाळी 9.30 वाजता सुरु होणार आहे. टी-20 मालिकेत श्रीलंकेचा 3-0 असा क्लीन स्वीप केल्यानंतर आता टीम इंडिया (Team India) आता कसोटी मालिकेतही श्रीलंकेचा पूर्ण सफाया करण्यासाठी सज्ज आहे. रोहित शर्मा (Rohit Sharma) टी-20 परीक्षेत 100 पैकी 100 गुणांनी उत्तीर्ण झाला. न्यूझीलंड, वेस्ट इंडिज आणि श्रीलंका विरुद्ध सलग तीन मायदेशातील टी-20 मालिकेत भारताने निर्विवाद वर्चस्व गाजवले. आणि पूर्णवेळ कर्णधार म्हणून रोहित प्रथमच कसोटी संघाचे नेतृत्व करणार असून आता त्याची रेड चेंडू क्रिकेटमधील सर्वात मोठी कसोटी लागणार आहे. दक्षिण आफ्रिकेविरुद्ध कसोटी मालिकेनंतर विराट कोहली (Virat Kohli) नेतृत्व पदावरून पायउतार झाला, तर श्रीलंकेविरुद्ध कसोटी मालिकेसाठी अजिंक्य रहाणे आणि चेतेश्वर पुजारा या वरिष्ठ फलंदाजांना बाहेर करण्यात आले आहे. अशा परिस्थितीत रोहितसमोर सर्वात मोठी डोकेदुखी असेल ती फलंदाजी ठरू शकते. (IND vs SL 1st Test: मोहाली कसोटीत विराट कोहली याला अशा मोठ्या विक्रमाची संधी जो कोणत्याही भारतीय फलंदाजाला आतापर्यंत नाही जमला)

उल्लेखनीय आहे की या मोसमात तीन कसोटी सामन्यांसाठी (श्रीलंकेविरुद्ध दोन आणि इंग्लंडविरुद्ध एक) रहाणे आणि पुजारा यांचा संघात समावेश होणार नसल्याचे आता स्पष्ट झाले आहे. या सामन्यांमध्ये हनुमा विहारी आणि शुभमन गिल हे पर्याय असतील तर श्रेयस अय्यरला ‘बॅकअप’ म्हणून ठेवण्यात येईल. केपटाउन येथे खेळल्या गेलेल्या भारताच्या शेवटच्या कसोटीत दोन जागा रिक्त आहेत आणि जेव्हा विराट कोहली मोहालीमध्ये 100 वा कसोटी सामना खेळण्यासाठी बाहेर पडेल, तेव्हा हे तीन युवा खेळाडू गेल्या दशकापासून व्यस्त जागांवर आपला दावा पक्का करण्याचा प्रयत्न करतील. पुजारा आणि रहाणे यांनी यापूर्वी भारतीय कसोटी संघाची मधली फळी काबीज केली होती.

भारताचा माजी सलामीवीर देवांग गांधी पीटीआयला म्हणाला, “माझे मत आहे की शुभमन तिसऱ्या क्रमांकासाठी सर्वोत्तम पर्याय आहे. तो सलामीला येऊ शकतो, पण रोहितसोबत डावाची सलामी देण्यासाठी मयंक आहे आणि अशा स्थितीत शुभमनसाठी नंबर 3 चा आदर्श पर्याय असेल.” शुभमनने ऑस्ट्रेलियामध्ये सलामी फलंदाज म्हणून कसोटी पदार्पण केले होते. तसेच रहाणे प्रामुख्याने पाचव्या क्रमांकावर फलंदाजी करायचा, परंतु द्रविड आणि रोहित या क्रमांकावर ऋषभ पंतला मैदानात उतरवण्याची शक्यता आहे तर विहारी सहाव्या क्रमांकावर उतरेल. आणि मग रवींद्र जडेजा सातव्या क्रमांकावर उतरू शकतो, जो डावखुरा फलंदाज आहे. अशाप्रकारे भारताचा फलंदाजी क्रम तयार केला जाऊ शकतो.

(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement