IND vs SL 3rd T20I: भारतीय गोलंदाजांनी केला कहर; टीम इंडियाने श्रीलंकाविरुद्ध 78 धावांनी विजय मिळवत केला 2-0 क्लीन-स्वीप
भारताने दिलेल्या 202 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करणाऱ्या श्रीलंकेला 123 धावाच करता आल्या. प्रथम फलंदाजी करताना टीम इंडियाने 20 षटकांत 6 गडी गमावून 201 धावा केल्या. भारतानाडून नवदीप सैनीने सर्वाधिक 3, वॉशिंग्टन सुंदर आणि शार्दूल ठाकूर यांनी प्रत्येकी 2 आणि जसप्रीत बुमराह याने 1 गडी बाद केला. गोलंदाजांनी पुन्हा एकदा जबरदस्त कामगिरी करत संघाच्या विजयात महत्वाची भूमिका बजावली.
पुण्याच्या महाराष्ट्र क्रिकेट स्टेडियममधील टी-20 सामन्यात भारताने (India) दिलेल्या 202 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करणाऱ्या श्रीलंकेला (Sri Lanka) 123 धावाच करता आल्या. प्रथम फलंदाजी करताना टीम इंडियाने 20 षटकांत 6 गडी गमावून 201 धावा केल्या आणि भारताने 78 धावांनी विजय मिळवला. भारतानाडून नवदीप सैनी (Navdeep Saini) ने सर्वाधिक 3, वॉशिंग्टन सुंदर आणि शार्दूल ठाकूर यांनी प्रत्येकी 2 आणि जसप्रीत बुमराह याने 1 गडी बाद केला. गोलंदाजांनी पुन्हा एकदा जबरदस्त कामगिरी करत संघाच्या विजयात महत्वाची भूमिका बजावली. धनंजय डी सिल्वा (Dhananjay di Silva) याने श्रीलंकाकडून सर्वाधिक धावा केल्या. डी सिल्वाने धावा केल्या, मात्र त्याला दुसऱ्या टोकाकडून साथ मिळाली नाही. अनेक महिन्यानंतर श्रीलंकेसाठी टी-20 सामना खेळणाऱ्या एंजेलो मॅथ्यूज (Angelo Mathews) यानेही निराश केले नाही.मॅथ्यूजने 31 धावा केल्या. या विजयासह भारताने 3 सामन्यांच्या मालिकेत 2-0 ने श्रीलंकेचा क्लीन-स्वीप केला. गुवाहाटीमधील पहिला सामना पावसामुळे रद्द झाला होता, मात्र नंतर इंदोर आणि आज पुण्यातील सामना जिंकत भारताने एकतर्फी सामन्यात विजय मिळवला. नवीन वर्षातील भारताचा हा पहिला मालिका विजय आहे. (IND vs SL 3rd T20I: जसप्रीत बुमराह याने अश्विन आणि युजवेंद्र चहल यांना मागे टाकत बनला टीम इंडियासाठी सर्वाधिक टी-20 विकेट्स घेणारा गोलंदाज)
भारताने दिलेल्या लक्ष्याच्या पाठलाग करत श्रीलंका संघाने 4 ओव्हरमध्ये तीन गडी गमावले. पहिल्या षटकात बुमराहने दानुष्का गुणातीलाकाला बाद केले. यानंतर शार्दुल ठाकूर यांनी अविष्का फर्नांडोला पॅव्हिलिअनचा मार्ग दाखविला. मनीषा पांडे याने ओशदा फर्नांडोला धावबाद करत श्रीलंकेला तिसरा धक्का दिला. सैनीने पॉवर-प्लेच्या अखेरच्या षटकात कुसल परेराला बोल्ड करून श्रीलंकेच्या अडचणीत वाढ केली. श्रीलंकेने पॉवर प्लेमध्ये 4 गडी राखून 35 धावा केल्या. यानंतर धनंजय डी सिल्वा आणि मॅथ्यूजने श्रीलंकेसाठी अवघ्या 29 चेंडूत अर्धशतकी भागीदारी करत डाव सावरण्याचा प्रयत्न केला. दोघांमध्ये 68 धावांची भागीदारी होती पण वॉशिंग्टन सुंदरने 12 व्या षटकात मॅथ्यूजला बाद केले. मॅथ्यूजने 20 चेंडूत 31 धावा केल्या.
दरम्यान, टॉस गमावून पहिले फलंदाजी केएल राहुल आणि शिखर धवन यांनी भारताला वेगवान सुरुवात करून दिली. दोंघांनी अर्धशतक लगावले, पण मोठा खेळ करू शकले नाही. राहुलने 34 चेंडूत अर्धशतक तर धवनने 34 चेंडूत दहावे टी-20 अर्धशतक पूर्ण केले. तब्बल 5 वर्षानंतरटी-20सामने खेळणारा संजू सॅमसन काही खास करू शकला नाही आणि 6 धावांवर बाद झाला. पहिल्याच चेंडूवर षटकार मारत त्याने खाते उघडले. मात्र, त्याने आपली विकेट हसरंगाला दिली. यानंतर श्रेयस अय्यरही 4 धावा करुन संदकनचा बळी बनला. विराट आणि मनीषने भारतीय डाव हाताळला आणि पाचव्या विकेटसाठी 42 धावांची भागीदारी केली पण 18 व्या षटकात विराट 26 धावांवर वैयक्तिक धावसंख्येवर धावबाद झाला. यानंतर मनीष आणि शार्दुलने वेगवान फलंदाजी करत टीम इंडियाचा स्कोर 200 च्या पार नेला. दोघांनीही 15 चेंडूत 37 धावांची भागीदारी केली. शार्दुलने 8 चेंडूत नाबाद 22 धावा केल्या तर पांडेने 18 चेंडूत नाबाद 31 धावा केल्या.
(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)