IND vs SA 1st Test: दक्षिण आफ्रिकेची सेंच्युरियन कसोटीत अपराजित राहण्याची मालिका खंडीत, टीम इंडियाच्या दणदणीत विजयावर विराट कोहली काय म्हणाला
विराट कोहलीच्या नेतृत्वात भारतीय संघाने दक्षिण आफ्रिका दौऱ्याची धमाकेदार सुरुवात केली आहे. टीम इंडियाने सेंच्युरियनचा ज्या मैदानावर यजमान संघाला पराभूत करणे अशक्य मानले जाते त्या मैदानावर पराभूत करून मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली. सेंच्युरियनचा किल्ला जिंकल्यानंतर विराटने सादरीकरणादरम्यान आपल्या संघाचे कौतुक केले.
IND vs SA 1st Test 2021: विराट कोहलीच्या (Virat Kohli) नेतृत्वात भारतीय संघाने (Indian Team) दक्षिण आफ्रिका दौऱ्याची (South Africa Tour) धमाकेदार सुरुवात केली आहे. टीम इंडियाने सेंच्युरियनचा (Centurion) ज्या मैदानावर यजमान संघाला पराभूत करणे अशक्य मानले जाते त्या मैदानावर पराभूत करून मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली. या मैदानावर झालेल्या 80 टक्के सामने दक्षिण आफ्रिकेच्या संघाने जिंकले आहेत. पण यजमान संघाचा अभेद्य किल्ला भेदत ‘विराटसेने’ने वर्षाचा शेवट गोड केला आणि आपण कोणत्या इराद्याने दौऱ्यावर आलो आहोत हे स्पष्ट केले आहे. सेंच्युरियनमध्ये दक्षिण आफ्रिकेच्या संघाला पराभूत करणारा कोहली हा पहिला आशियाई कर्णधार ठरला आहे. सेंच्युरियनचा किल्ला जिंकल्यानंतर विराटने सादरीकरणादरम्यान आपल्या संघाचे कौतुक केले. (IND vs SA 1st Test: टीम इंडियाने जिंकला सेंच्युरियन किल्ला, ऐतिहासिक विजयासाठी सोशल मीडियावर अभिनंदनाचा वर्षाव; म्हणाले- ‘2021 वर्ष अभूतपूर्व ठरले’)
विराटने सांगितले की “आमची सामन्यात चांगली सुरुवात झाली. सामन्याच्या चौथ्या दिवशी विजय मिळवणे हे दर्शवते की आम्ही किती चांगले क्रिकेट खेळलो. एक दिवस पावसात वाहून गेला तरी आपण जिंकण्यासाठी किती उत्सुक होतो हेच दाखवते.” दक्षिण आफ्रिकेला क्रिकेट खेळण्यासाठी अवघड ठिकाण असल्याचे सांगताना विराट म्हणाला, “दक्षिण आफ्रिकेत सेंच्युरियन येथे क्रिकेट खेळणे नेहमीच कठीण होते. पण जिंकण्यासाठी आम्हाला बॅट, बॉल आणि फिल्डिंगमध्ये चांगली कामगिरी करायची होती आणि आम्ही ते केले. आम्हाला हवा होता तो निकाल मिळाला. ही आमच्यासाठी चांगली सुरुवात आहे.” दरम्यान फलंदाज म्हणून विराटसाठी हा सामना प्रभावी ठरला नाही. कोहलीने पहिल्या डावात 35 धावा केल्या तर दुसऱ्या डावात तो 18 धावाच करू शकला. उल्लेखनीय म्हणजे विराट पहिल्या डावात फलंदाजी करताना चांगल्या लयीत दिसत होता मात्र बाहेर जाणारा चेंडू खेळण्याच्या प्रयत्नात तो दोन्ही डावात स्वस्तात बाद झाला.
याशिवाय यजमान संघाविरुद्ध या सामन्यातील विजयाचे कारण स्पष्ट करताना टीम इंडियाचा कसोटी कर्णधार म्हणाला की, “आम्ही सामन्यात ज्या प्रकारची शिस्त दाखवली ती वाखाणण्याजोगी आहे. परदेशी भूमीवर कठीण परिस्थितीत नाणेफेक जिंकून फलंदाजी करणे आव्हानात्मक असते. पण याचे बरेच श्रेय केएल राहुल आणि मयंक अग्रवाल या सलामीच्या जोडीला जाते. त्याने ज्या प्रकारे आमची जुळवाजुळव केली आणि आम्हाला दिले ते आश्चर्यकारक होते. पहिल्या दिवसाचा खेळ संपल्यानंतर आम्ही 3 बाद 272 अशी मजबूत स्थितीत होतो. 300 किंवा 320 च्या आसपास स्कोअर आमच्यासाठी चांगला असेल हे आम्हाला चांगलं माहीत होतं.”
(The above story first appeared on LatestLY on Dec 30, 2021 06:40 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

