IND vs ENG Series 2021: भारत-इंग्लंड यांच्यातील या मालिकेसाठी स्टेडियममध्ये प्रेक्षकांच्या एन्ट्रीला BCCI ग्रीन सिग्नल देण्यास उत्सुक, पण एकच अडचण

IND vs ENG T20I Series 2021: इंग्लंडच्या भारत दौऱ्याला (England Tour of India) 5 फेब्रुवारीपासून सुरुवात होणार आहे आणि भारतातील क्रिकट चाहत्यांसाठी एक खुशखबर समोर आली आहे. कोविड-19 महामारीमुळे तामिळनाडू क्रिकेट असोसिएशनने चेन्नई येथील पहिल्या दोन टेस्ट सामन्यांसाठी स्टेडियममध्ये चाहत्यांची एन्ट्रीवर बंदी घातली होती, मात्र आता ANI ने दिलेल्या वृत्तानुसार भारत (India)-इंग्लंड (England) दरम्यान होणाऱ्या टी-20 मालिकेसाठी बीसीसीआय (BCCI) स्टेडियममध्ये प्रेक्षकांना परवानगी देण्यावर विचार करत आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (बीसीसीआय) 12 मार्चपासून अहमदाबादच्या मोटेरा स्टेडियमवर सुरू होणाऱ्या टी-20 मालिकेसाठी चाहत्यांना पुन्हा स्टेडियमवर आणण्यास उत्सुक आहे. ANI शी बोलताना बीसीसीआयच्या अधिकाऱ्याने सांगितले की, अहमदाबादमधील स्टेडियम चाहत्यांसाठी खुले करण्यासाठी बोर्ड प्रयत्न करीत आहे, तरी अंतिम निर्णय अद्याप सरकारकडे आहे. (IND vs ENG Test Series 2021: भारत-इंग्लंड यांच्यातील पहिल्या दोन टेस्ट मॅच प्रेक्षकांविना, चेपॉक स्टेडियमवर खेळले जाणार दोन्ही सामने)

“आम्ही भारत आणि इंग्लंड यांच्यातील रोमांचक टी-20 मालिका पाहण्यासाठी चाहत्यांसाठी स्टेडियम उघडण्याचा प्रयत्न करीत आहोत. संख्या ठरवणे बाकी असताना उपस्थित जागांपैकी 50 टक्के जागा भरण्याचा आमचा विचार आहे. पण अंतिम निर्णय सरकारवर आहे. पण, अंतिम निर्णय सरकारच्या हाती आहे. आपण नवीन सामान्य परिस्थितीशी जुळवून घेत असताना सुरक्षितेला प्राधान्य दिलं जातं,” अधिकारी म्हणाले. तामिळनाडू क्रिकेट असोसिएशनने (टीएनसीए) आधीच म्हटले की एम. ए. चिदंबरम स्टेडियमवर भारत आणि इंग्लंड यांच्यात होणाऱ्या पहिल्या दोन कसोटी सामन्यांसाठी कोणतेही तिकीट विक्रीसाठी उपलब्ध होणार नाही. ANI ने दिलेल्या परिपत्रकात टीएनसीएचे सचिव आरएस रामासामी यांनी सदस्यांना सूचित केले की प्रचलित कोविड-19 महामारी लक्षात घेऊन हा निर्णय घेण्यात आला आहे.

भारत-इंग्लंड संघातील पहिला कसोटी सामना 5 ते 9 फेब्रुवारी आणि दुसरा सामना 13 ते 17 फेब्रुवारी दरम्यान खेळला जाईल. त्यानंतर दोन्ही संघ 24 ते 28 फेब्रुवारी आणि 4 ते 8 मार्च दरम्यान होणाऱ्या दुसऱ्या मॅचसाठी अहमदाबादला रवाना होतील. मंगळवारी चेतन शर्मा यांच्या नेतृत्वात भारतीय निवड समितीने इंग्लंडविरुद्ध पहिल्या दोन कसोटी सामन्यांसाठी संघ निवडला. विराट कोहली, हार्दिक पांड्या आणि ईशांत शर्मा यांनी पुन्हा संघात प्रवेश केला आहे.