T20 World Cup: 2024 पासून टी-20 वर्ल्ड कप स्पर्धेत 20 संघात होणार रस्सीखेच, ICC संघांची संख्या वाढवण्याच्या विचारात

आयसीसी टी-20 विश्वचषक स्पर्धेत मोठ्या प्रमाणावर बदल होऊ शकतो कारण आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद (आयसीसी) 2024च्या आवृत्तीत सध्याच्या स्वरुपात 16 ऐवजी 20 संघाच्या सहभागावर विचार करत आहे. ESPNCricinfoच्या अहवालानुसार, लीग टप्प्यात 20 संघाचे पाच गटात चार संघांचे विभाजन केले जाईल.

आयसीसी टी -20 वर्ल्ड कप 2020 ट्रॉफी  (Photo Credits: Getty Images)

ICC T20 World Cup Expansion: आयसीसी टी-20 विश्वचषक (T20 World Cup) स्पर्धेत मोठ्या प्रमाणावर बदल होऊ शकतो कारण आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद (International Cricket Council) 2024च्या आवृत्तीत सध्याच्या स्वरुपात 16 ऐवजी 20 संघाच्या सहभागावर विचार करत आहे. ESPNCricinfoच्या अहवालानुसार, लीग टप्प्यात 20 संघाचे पाच गटात चार संघांचे विभाजन केले जाईल. आयसीसी खेळाच्या वाढीसाठी वाहनचालक म्हणून छोट्या फॉरमॅटकडे पाहत आहेत, परंतु काही राष्ट्रीय क्रिकेट मंडळांकडून होणारा आक्षेप अडथळा ठरत आहे. पण, आता स्पर्धेच्या विस्ताराबाबत आयसीसी (ICC) ठाम असून ऑलिम्पिक (Olympic) यामागील प्रमुख कारण मानले जात आहे. तथापि, आयसीसी टी-20 विश्वचषक 2021 आणि 2022 त्यांच्या सध्याच्या 16-संघीय स्वरूपात राहील. (T20 वर्ल्ड कपसाठी श्रीलंका क्रिकेटला या स्टार खेळाडूची गरज, लवकरच टीममध्ये होणार)

2021 आवृत्ती ऑक्टोबरमध्ये भारतात खेळली जाणार आहे तर 2022 ऑस्ट्रेलिया आयोजित करेल. आयसीसी छोट्या फॉर्मेट व्यतिरिक्त आगामी वनडे वर्ल्ड कप स्पर्धेत देखील सध्याच्या दहा ते 14 अशी वाढ करण्याच्या विचारात आहे. तथापि 2023 वर्ल्डकपमध्ये हा विस्तार दिसण्याची शक्यता कमी आहे. रग्बी आणि फुटबॉलसारख्या इतर खेळांसारखे क्रिकेट सर्वसमावेशकतेचे स्वागत करत नाही. 2007 एकदिवसीय विश्वचषकातील 16 संघांमधून आयसीसीने हळूहळू सहभागी संघांची संख्या कमी केली आहे. 2011 वर्ल्ड कप स्पर्धेत 14 संघ तर 2015 आणि 2019 आयसीसी विश्वचषक स्पर्धेत 10 संघांमध्ये रस्सीखेच पाहायला मिळाली होती.

दरम्यान, अहवालात असेही म्हटले आहे की, बीसीसीआयने हा खेळ ऑलिम्पिकमध्ये आणण्याच्या दृष्टीने ईसीबीला पाठिंबा दर्शविला आहे, परंतु भारतीय ऑलिम्पिक असोसिएशनकडून अद्याप याबाबत कोणताही विचार करण्यात आलेला नाही आहे. दुसरीकडे, टी-20 वर्ल्ड कपमधील सर्वात यशस्वी संघाबद्दल बोलायचे तर वेस्ट इंडिजने आजवर सर्वाधिक दोन विजेतेपद जिंकले आहेत. शिवाय भारत, पाकिस्तान, इंग्लंड आणि श्रीलंका संघांनी एकदा विजेतेपदावर नाव कोरले आहे. वेस्ट इंडिज टीमने डॅरेन सॅमीच्या नेतृत्वात रोमांचक सामन्यात इंग्लंडचा पराभव करून 2016 मधील टी-20 वर्ल्ड कपचे विजेतेपद पटकावले होते.

(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)

Share Now

Share Now