Coronavirus: भारताच्या विशेष-सक्षम संघाचा माजी कर्णधार MGNREGAत करतोय दगड फोडण्याचे काम, सोनू सूदने केली आर्थिक मदत
सर्व क्रिकेटर्स भव्य जीवन व्यतीत करत नाहीत आणि उत्तराखंडचे 34 वर्षीय विशेष-सक्षम क्रिकेट संघाचा कर्णधार राजेंद्र सिंह धामी नक्कीच हे मान्य करेल. धामी यांनी स्वत:च्या रोजागारासाठी 'मनरेगा'त मजुरीचा आधार घेतला आहे. नुकतच धामीला अभिनेता सोनू सूदकडून 11,000 रुपयांची आर्थिक मदत मिळाली ज्याने भविष्यात आणखी मदतीची ग्वाही देखील दिली.
सर्व क्रिकेटर्स भव्य जीवन व्यतीत करत नाहीत आणि उत्तराखंडचे 34 वर्षीय विशेष-सक्षम क्रिकेट संघाचा (Uttarakhand specially-abled Cricket Team) ) कर्णधार राजेंद्र सिंह धामी (Rajendra Singh Dhami) नक्कीच हे मान्य करेल. कोरोना व्हायरस (Coronavirus) लॉकडाऊनमुळे उद्योगधंदे बंद पडल्याने अनेक मजुरांवर उपासमारीची वेळ ओढवली आहे. खेळाडूंनाही अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. कोरोना संकट काळात अनेकांना बॉलीवूड अभिनेता सोनू सूदने (Sonu Sood) आपल्यातर्फे मदत केली आहे. धामीवर्षी कोरोना काळात संकट ओढवले आणि राज्य शासनाकडून कोणतीही मदत न मिळाल्यास धामी यांनी स्वत:च्या रोजागारासाठी 'मनरेगा'त मजुरीचा आधार घेतला आहे. दरम्यान त्यांनी स्वतःची टीम तयार केली. भारतीय विशेष क्रिकेट संघाचा कर्णधार धामी फलंदाजी, गोलंदाजी, क्षेत्ररक्षण यासह क्रिकेटच्या विविध बाबींमध्ये किमान 19 खास प्रशिक्षित किशोरांना प्रशिक्षण देत आहे. (Coronavirus: 'माझी सगळी पदकं तुमची', ऑलिम्पिक 'गोल्डन गर्ल' कॅरोलिना मारिनचा करोनाशी सामना करणाऱ्या योद्धांना सलाम)
“मी अनेक‘ दिव्यांग ’लोकांचे जीवन पाहिले आहे की ते ताणतणावात आणि आशा गमावत आहेत. मी देखील एकदा त्याच गडद क्षेत्रात गेलो होतो परंतु हार मानण्यास नकार दिला. माझे प्रयत्न त्यांच्या आयुष्याचे उद्दीष्ट देण्यावर केंद्रित आहेत ज्यावर ते कायमचे धरून राहू शकतील आणि तारेप्रमाणे चमकतील,”‘न्यू इंडियन एक्स्प्रेस’ने धामीचे म्हणणे उद्धृत केले. नुकतच धामीला अभिनेता सोनू सूदकडून 11,000 रुपयांची आर्थिक मदत मिळाली ज्याने भविष्यात आणखी मदतीची ग्वाही देखील दिली.
2015 मध्ये उत्तराखंडचे तत्कालीन मुख्यमंत्री उत्तराखंड हरीश रावतकडून धामी यांना राज्य पुरस्कार प्राप्त झाला ज्यात त्याला 5000 रुपये रोख, कौतुकाचे प्रमाणपत्र आणि नोकरीची आश्वास मिळाले पण आजवर त्याला मिळाले नाही. दुसरीकडे, सध्या कौटुंबिक उत्पन्न 3,000 रुपयांपेक्षा जास्त नसल्याने तो आणि त्याचे वडील मजूर म्हणून काम करतात तर आई दुधाची विक्री करुन काही कमाई करते. सरकारने सीमावर्ती भागात मूलभूत सुविधा व पायाभूत सुविधा उपलब्ध करुन द्याव्यात जेणेकरुन लोकांना रोजगाराच्या काही संधी निर्माण व्हाव्यात अशी धमीची इच्छा आहे.