South Africa Beat India: दुसऱ्या टी-20 मध्ये दक्षिण आफ्रिकेने भारतावर पाच गडी राखून मिळवला विजय, मालिकेत 1-0 ने घेतली आघाडी

रोमहर्षक लढतीत दक्षिण आफ्रिकेने टीम इंडियाचा पाच विकेट राखून पराभव केला आणि मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली. या मालिकेतील पहिला सामना पावसामुळे रद्द झाला होता.

IND vs SA, 2nd T20I: टीम इंडिया आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील तीन टी-20 सामन्यांच्या मालिकेतील दुसरा सामना आज खेळला गेला. हा सामना गकेबरहा शहरातील सेंट जॉर्ज पोर्क येथे खेळला गेला. रोमहर्षक लढतीत दक्षिण आफ्रिकेने टीम इंडियाचा पाच विकेट राखून पराभव केला आणि मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली. या मालिकेतील पहिला सामना पावसामुळे रद्द झाला होता. तत्पूर्वी, दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार एडन मार्करामने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. नाणेफेक हारल्यानंतर प्रथम फलंदाजीला आलेल्या टीम इंडियाने 19.3 षटकांत सात गडी गमावून 180 धावा केल्या. टीम इंडियाच्या वतीने रिंकू सिंगने शानदार फलंदाजी करत 68 धावांची नाबाद खेळी केली. दक्षिण आफ्रिकेकडून जेराल्ड कोएत्झीने सर्वाधिक तीन बळी घेतले. लक्ष्याचा पाठलाग करताना दक्षिण आफ्रिकेच्या संघाने अवघ्या 13.5 षटकांत पाच गडी गमावून लक्ष्य गाठले. दक्षिण आफ्रिकेकडून सलामीवीर रीझा हेंड्रिक्सने सर्वाधिक 49 धावा केल्या. टीम इंडियाकडून मुकेश कुमारने सर्वाधिक दोन विकेट घेतल्या. टीम इंडिया आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील मालिकेतील तिसरा आणि शेवटचा सामना 14 डिसेंबरला होणार आहे.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement