India Lost World Cup Final: भारताचे विश्वचषक जिंकण्याचे स्वप्न भंगले; ट्रॅव्हिस हेडच्या शानदार शतकाच्या जोरावर ऑस्ट्रेलिया सहाव्यांदा बनला विश्वविजेता

ट्रॅव्हिस हेडने शानदार शतक ठोकले तर लॅबुशेनने अर्धशतकीय पारी खेळली. या विजयासह ऑस्ट्रेलियाने सहाव्यांदा विश्वचषकाची ट्रॉफी उचलली आहे.

भारताने दिलेल्या 241 धावांचे लक्ष्य 3 विकेटच्या मोबदल्यात सहज पार करत ऑस्ट्रेलियाने सहाव्यांदा क्रिकेटचे विश्वविजेतेपद जिंकले आहे. ऑस्ट्रेलियाचे तीन विकेट लवकर प्राप्त केल्यानंतर भारत हा सामना जिंकेल अशी आशा जिवंत झाली होती पंरतू ट्रॅव्हिस हेड आणि मार्नस लॅबुशेन यांनी करोडो भारतीयांच्या आशेवर पाणी फेरले. ट्रॅव्हिस हेडने शानदार  शतक ठोकले तर लॅबुशेनने अर्धशतकीय पारी खेळली. ट्रॅव्हिस हेडने 121 चेंडूत 137  धावांची खेळी केली. या विजयासह ऑस्ट्रेलियाने सहाव्यांदा विश्वचषकाची ट्रॉफी उचलली आहे.

पाहा पोस्ट -

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement