IND vs WI 5th T20: पाचव्या T20I मध्ये भारताने वेस्ट इंडिजचा 88 धावांनी पराभव करत पाच सामन्यांची मालिका 4-1 ने जिंकली

नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना भारताने 7 बाद 188 धावा केल्या आणि त्यानंतर 15.4 षटकांत वेस्ट इंडिजला 100 धावांत गुंडाळले.

भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील पाच सामन्यांच्या T20 मालिकेतील पाचवा आणि अंतिम सामना (India vs West Indies 5th T20I) 7 ऑगस्ट रोजी फोर्ट लॉडरहिल, फ्लोरिडा, यूएसए येथे खेळला गेला. भारताने हा सामना 88 धावांनी जिंकून मालिका 4-1 अशी खिशात घातली. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना भारताने 7 बाद 188 धावा केल्या आणि त्यानंतर 15.4 षटकांत वेस्ट इंडिजला 100 धावांत गुंडाळले. वेस्ट इंडिजकडून शिमरॉन हेटमायरने सर्वाधिक 56 धावांची खेळी केली. त्याच्याशिवाय शामर ब्रूक्सने 13 धावा केल्या. भारताकडून रवी बिश्नोईने 2.4 षटकात 16 धावा देत 4 बळी घेतले. त्याचवेळी अक्षर पटेल आणि कुलदीप यादव यांनी प्रत्येकी तीन बळी घेतले.

Tweet

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)