IND vs SL 2nd T20: टीम इंडियाने नाणेफेक जिंकली, प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय

सामन्यासाठी भारतीय संघाने आपल्या प्लेइंग इलेव्हनमध्ये कोणताही बदल केलेला नाही आणि लखनौमध्ये सहज विजय मिळवणाऱ्या 11 खेळाडूंवर विश्वास ठेवला आहे. त्याचबरोबर श्रीलंकेच्या संघाने आपल्या प्लेइंग इलेव्हनमध्ये दोन बदल केले आहेत.

रोहित शर्मा (Photo Credit: PTI)

भारत आणि श्रीलंका (IND vs SL) यांच्यातील T20 मालिकेतील दुसरा सामना आज धर्मशाला (Dharmashala) येथे खेळला जात आहे. भारतीय संघ T20 मालिकेत आधीच 1-0 ने आघाडीवर आहे आणि आज ती मालिका जिंकण्याचा त्यांचा प्रयत्न असेल. भारतीय कर्णधार रोहित शर्माने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. या सामन्यासाठी भारतीय संघाने आपल्या प्लेइंग इलेव्हनमध्ये कोणताही बदल केलेला नाही आणि लखनौमध्ये सहज विजय मिळवणाऱ्या 11 खेळाडूंवर विश्वास ठेवला आहे. त्याचबरोबर श्रीलंकेच्या संघाने आपल्या प्लेइंग इलेव्हनमध्ये दोन बदल केले आहेत. शेवटच्या सामन्यात खेळलेले जेफ्री वँडरसे आणि जेनिट लियांज हे बाहेर गेले आहेत. त्यांच्या जागी बुनुरा फर्नांडो आणि दानुष्का गुणातिलका यांना संधी देण्यात आली आहे.

Tweet

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement